भारतीय क्रिकेटमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा यांनी अनेक खळबळजनक दावे करत भारतीय क्रिकेटमध्ये भूकंप आणला आहे. एका स्टिंग ऑपरेशन मध्ये त्यांनी असे काही खुलासे केले आहेत, ज्यामुळे आगामी काळात भारतीय क्रिकेटमध्ये अनेक गोष्टी घडून येऊ शकतात. जवळपास वर्षभराआधी चर्चेत असलेला विराट कोहलीच्या नेतृत्व सोडण्याचा मुद्दा आता पुन्हा एकदा या स्टिंग ऑपरेशनमुळे पुढे आला आहे.
नुकतेच एका वृत्तवाहिनीने स्टिंग ऑपरेशन केले. यादरम्यान चेतन शर्मा हे अनेक गोष्टींचा उलगडा करताना दिसले. 2021 च्या सप्टेंबर महिन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली याने आपल्या टी20 कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. भारतीय संघाची विश्वचषकातील खराब कामगिरी झाल्यानंतर आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने रोहित शर्मा याला टी20 व वनडेमध्ये नियमित कर्णधार बनवले.
तत्कालीन बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आपण विराट कोहलीला नेतृत्व सोडण्याबाबत पुन्हा एकदा पुनर्विचार करण्याचे आवाहन केल्याचे म्हटले होते. त्यानंतर विराटने थेट पत्रकार परिषदेत आपल्याला असे कोणीही समजावण्याचा प्रयत्न केला नसल्याचे सांगितलेले.
याच प्रकरणावर या स्टिंग ऑपरेशनमध्ये बोलताना चेतन शर्मा म्हणाले,
“आम्हाला मर्यादित षटकांच्या संघासाठी दोन कर्णधार नको होते. रोहितला कर्णधार बनवण्याचा निर्णय माझा आणि निवड समितीचा होता. मात्र, विराट आणि गांगुली यांचे इगो एकमेकांच्या आड आले. गांगुली यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत विराटला नेतृत्व न सोडण्याचे आवाहन करत पुन्हा एकदा पुनर्विचार करण्यास सांगितलेले. त्या बैठकीला नऊ लोक हजर होते. कदाचित विराटने ही गोष्ट ऐकलेली नसावी.”
चेतन शर्मा यांच्या या स्टिंग ऑपरेशननंतर अजूनही अनेक गंभीर मुद्दे समोर आलेले दिसत आहेत.
(Chetan Sharma Confirm Ego Issue Of Virat Kohli And Sourav Ganguly In Sting Operation)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! ‘टीम इंडियाचे खेळाडू इंजेक्शन घेऊन फिटनेस सिद्ध करतात’, मुख्य निवडकर्त्याचा सनसनाटी खुलासा
व्हॅलेंटाईनच्या दिवशी शुबमनने शेअर केला साराने हजेरी लावलेल्या कॅफेतील फोटो, नक्की भानगड काय?