क्रिकेट जगतातील प्रत्येक खेळाडूच्या काही भन्नाट आठवणी, भयानक किस्से असतात. असेच काहीसे भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विन याच्याबाबतही आहे. अश्विन याने त्याच्या २०२०-२१ बॉर्डर-गावसकर ट्रॉफी दरम्यान ऑस्ट्रेलियात घडलेल्या अशाच काहीशा भयानक किस्स्याबाबत सांगितले आहे. काय म्हणाला आहे अश्विन चला जाणून घेऊया…
आर अश्विन (R Ashwin) याने सांगितले आहे की, सिडनीला जाताना विमानात भारतीय संघाच्या खेळाडूंचा थरकाप उडाला होता. त्याने सांगितले की, एका क्षणासाठी संपूर्ण संघाला वाटले की, विमान सिडनीत कधीही उतरणार नाही.
‘वादळ-वाऱ्याशी झाला सामना’
अश्विन याने विमानाचा खतरनाक अनुभवाचा उल्लेख हा ‘बंदों में था दम’ (Bandon Mein Tha Dum) या डॉक्यूमेंट्रीच्या ट्रेलर लाँचदरम्यान केला. ‘बंदों में था दम’ ही डॉक्यूमेंट्री ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक कसोटी विजयावर बनलेली ४ भागांची सीरिज आहे. अश्विन म्हणाला की, “आम्ही सिडनीसाठी झेप घेतली आणि त्यानंतर विमानाचा सामना वादळ-वाऱ्याशी झाला. हे इतके भीतीदायक होते की, एका क्षणाला वाटले की, विमान कधीही जमिनीवर उतरणार नाही.”
भारताने सिडनीत खेळलेला सामना अनिर्णित
विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघात झालेल्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना सिडनी येथे खेळला गेला होता. या सामन्यात अश्विन याने नाबाद ३९ आणि हनुमा विहारी याने नाबाद २३ धावांची खेळी केली होती. दोघांनीही सहाव्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी रचली होती. त्यांच्या याच खेळीमुळे भारतीय संघाला सिडनी कसोटी अनिर्णित करण्यात यश आले होते. यानंतर भारताने ब्रिस्बेनमध्ये खेळलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात विजय मिळवत मालिका २-१ने आपल्या नावावर केली होती.
“मी म्हणालो की, आम्ही एकेरी-दुहेरी धावा घेऊ”
अश्विनने सिडनी कसोटीत आपल्या आणि हनुमा विहारीच्या भागीदारीची आठवण काढत सांगितले की, “आम्ही मैदानावर जाताच परिस्थितीशी जुळवून घेतले होते. आम्हाला समजले की, कुठे चुकतंय. हनुमा दुखापतीमुळे बॅकफुटवर जात होता. तो हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीने ग्रासला होता. जेव्हा मी क्रीझवर गेलो, तेव्हा मी वेगवान गोलंदाजाविरुद्ध खेळू शकलो नव्हतो. त्या स्थितीत मी म्हणालो की, आम्ही एकेरी- दुहेरी धाव घेऊन खेळू आणि पाहू की, हे आमच्यासाठी कशाप्रकारे काम करते.”
अश्विनची कसोटी कारकीर्द
अश्विनच्या कसोटी कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर ८६ सामन्यातील १६२ डावांमध्ये गोलंदाजी करताना २.७७च्या इकॉनॉमी रेटने ४४२ विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान ५९ धावा देत ७ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. याव्यतिरिक्त त्याने कसोटीत फलंदाजी करताना १२३ डावांमध्ये २६.८९च्या सरासरीने २९३१ धावा चोपल्या आहेत. या धावा करताना त्याने ५ शतके आणि १२ अर्धशतकेही झळकावली आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हार्दिकवर धोनी आधीपासूनच मेहरबान, पहिल्या तीन सामन्यांमध्येच दिलेली ‘ही’ आनंदाची बातमी
असं काय झालं की, पुनरागमनानंतर हार्दिक पंड्याने पहिल्याच सराव सत्राला मारली दांडी, जाणून घ्या कारण
वयाच्या ५५व्या वर्षी माजी श्रीलंकन कर्णधाराचा भाऊ जाणार खडी फोडायला, पाहा काय केलाय राडा
धक्कादायक! माजी भारतीय खेळाडूच्या वडिलांना अटक, कोर्टाचा एक दिवसीय रिमांडचा आदेश, काय आहे प्रकरण?