भारत आणि इंग्लड यांच्यात तिसरा कसोटी सामना लीड्सच्या हेडिंग्ले स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्यातील दोन दिवसांचा खेळ झाला असून, यजमानांनी सामन्यावर चांगलीच पकड बनवली आहे. ३४५ धावांची मोठी आघाडी इंग्लंडकडे आहे आणि पहिल्या डावातील त्यांचे दोन गडी बाद होणे शिल्लक आहेत. यादरम्यान इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने सामन्याविषयी भविष्यावाणी केली आहे
पीटरसनने केली भविष्यवाणी
इंग्लंडचा माजी कर्णधार व आक्रमक फलंदाज केविन पीटरसनने या सामन्याविषयीची भविष्यवाणी केली. पीटरसनने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘मोईन अली रविवारी ६ बळी घेईल आणि मालिका १-१ अशी बरोबर होईल.’
पीटरसनच्या या ट्विटर पोस्टवर वापरकर्त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अनेक चाहत्यांनी म्हटले की, हा सामना रविवारपर्यंत जाऊच शकणार नाही. तर काही चाहत्यांनी म्हटले, भारत हा सामना गमावणार असल्याचे स्पष्ट असून, तू आता काहीही भविष्यवाणी करू शकतो.
https://twitter.com/KP24/status/1430839104372084736
सामन्यावर इंग्लंडचे वर्चस्व
लॉर्ड्स कसोटी गमावल्यानंतर यजमान इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात दमदार पुनरागमन केले. सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या सर्व वेगवान गोलंदाजांनी भारताचा पहिला डाव अवघ्या ७८ धावांमध्ये गुंडाळत पहिली लढाई जिंकली. त्यापाठोपाठ इंग्लंडचे सलामीवीर रॉरी बर्न्स व हसीब हमीद यांनी १३५ धावांची सलामी देत मोठ्या धावसंख्येची पायाभरणी केली.
दुसर्या दिवशी दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर कर्णधार जो रूटने आपला अफलातून फॉर्म कायम राखत मालिकेतील सलग तिसरे शतक साजरे केले. त्याला तीन वर्षानंतर पुनरागमन करत असलेल्या डेव्हिड मलानने अर्धशतक ठोकत उत्तम साथ दिली. भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या दिवशीच्या अखेरच्या सत्रात पाच बळी मिळवत काही प्रमाणात वापसी केली. मात्र, दुसऱ्या दिवसाखेर इंग्लंडची आघाडी ३४५ धावांची झाली होती. इंग्लंडचे आणखी दोन फलंदाज बाद होणे बाकी असून, तिसऱ्या दिवशी भारतीय संघ आपल्या डावाला सुरुवात करू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
एकेवेळी टीम इंडियाला रडवणारा ‘हा’ महान खेळाडू नंतर करत होता बस धुवण्याचे काम
अबब! ब्रॅडमन यांच्या ‘बॅगी ग्रीन’ला मिळाली ‘इतकी’ किंमत
पंचांनी हटवली रिषभच्या ग्लोव्हजवरील पट्टी, वाचा काय आहे नियम