भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाची दमछाक केली आहे. भारताने मालिकेत 2-0ने आघाडी घेतली आहे. उभय संघातील तिसऱ्या कसोटीला 1 मार्चपासून सुरुवात होणार आहे. भारताने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023 आपल्याकडे कायम ठेवली आहे. मात्र, संघ व्यवस्थापनासमोर एक प्रश्न आहे, तो म्हणजे केएल राहुल याचा खराब फॉर्म. राहुल सातत्याने संघर्ष करताना दिसत आहे, त्यामुळे तो टीकाकारांच्या निशाण्यावर आहे.
दोन कसोटीतील तीन डावात त्याने 20, 17 आणि 1 धाव केली आहे. अशात म्हटले जात आहे की, त्याला इंदोरमध्ये होणाऱ्या तिसऱ्या कसोटीतून बाहेर केले जाऊ शकते. उर्वरित दोन कसोटींसाठीही घोषणा झाली आहे, पण त्यातून राहुलला उपकर्णधारपदावरून हटवले आहे. त्यामुळे कदाचित त्याला प्लेइंग इलेव्हमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
रवी शास्त्रींचे स्पष्ट मत
अशात भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी राहुलच्या परिस्थितीवर मोकळेपणाने भाष्य केले आहे. यासोबतच त्यांनी उपकर्णधार म्हणून त्याच्या भूमिकेविषयीही वेगळे मत मांडले. त्यांच्यानुसार, भारतीय संघात कोणताही उपकर्णधार नसला पाहिजे. कमीत कमी घरगुती मालिकेत तर बिल्कुलच नाही.
आयसीसी रिव्ह्यू पॉडकास्टमध्ये शास्त्री म्हणाले की, “संघ व्यवस्थापनाने उपकर्णधारपदावर निर्णय घ्यावा. त्यांना राहुलच्या फॉर्मविषयी माहिती आहे. त्यांनी त्याची मानसिक स्थितीही माहिती आहे. त्यांना माहिती आहे की, त्यांना शुबमन गिल यासारख्या खेळाडूकडे कसे पाहिले पाहिजे. मी त्या व्यक्तींमध्ये सामील आहे, जे नेहमी या गोष्टीशी सहमत असतात की, कमीत कमी भारतात कोणताही उपकर्णधार निवडला नाही पाहिजे. यापेक्षा मी नेहमी माझी सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन निवडेल. तसेच, जर तुमच्या कर्णधाराला मैदानाबाहेर जावे लागले, तर तुम्ही एका अशा खेळाडूवर ही जबाबदारी सोपवू शकता, जो त्यावेळी वेळेवर गोष्टी सांभाळू शकेल. यामागील कारण म्हणजे तुम्ही कोणतीही समस्या निर्माण करू शकत नाहीत.”
शास्त्री पुढे बोलताना म्हणाले की, “जर एक उपकर्णधार चांगले प्रदर्शन करत नसेल, तर इतर कुणीतरी त्याच्या जागी असू शकतो. कमीत कमी कोणताही टॅग नाहीये. मी स्पष्ट स्पष्ट सांगतोय, मी कधीही मायदेशातील परिस्थितीत उपकर्णधार निवडण्यास पसंती दर्शवत नाही. परदेशी परिस्थितीत हे प्रकरण जरा वेगळे आहे. इथे तुम्हाला चांगला फॉर्म पाहिजे. तुम्हाला शुबमन गिलसारखा खेळाडू पाहिजे, जो शानदार फॉर्ममध्ये असेल. तो आव्हान देऊ शकेल. त्याने सातत्याने चांगली कामगिरी करत संघात जागा बनवली आहे. तो तुमचा उपकर्णधार नाहीये, हा सर्व संघ व्यवस्थापनाचा निर्णय असला पाहिजे.”
राहुलच्या फॉर्मवरही शास्त्री म्हणाले की, “तो एक प्रतिभावान खेळाडू आहे, त्याला ती प्रतिभा आता प्रदर्शनामध्ये दाखवण्याची गरज आहे.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “त्याला फॉर्मही पाहावा लागेल. त्याची मनस्थिती पाहावी लागेल. तो एक शानदार खेळाडू आहे, पण प्रतिभा हा एक छोटा भाग आहे. तुम्हाला त्याला निकालात बदलायचे असते आणि सातत्याने चांगली कामगिरी करायची असते. भारतात भरपूर प्रतिभा आहे, जी सातत्याने दरवाजे ठोठावत आहे. ही फक्त राहुलची बाब नाहीये, हे अनेक मधल्या फळीतील फलंदाज आणि गोलंदाजांबाबतही म्हटले जाऊ शकते.”
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तिसरा कसोटी सामना 1 मार्च ते 5 मार्चदरम्यान इंदोरच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या कसोटीत राहुलला संधी मिळते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (former coach ravi shastri said there should be no vice captain in indian team at home)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्रश्न होता विराट-रोहितबद्दल, पण हरभजनने धोनीचं नाव घेत जिंकली चाहत्यांची मने; तुम्हीही कराल कौतुक
समालोचन करताना पुन्हा घसरली गावसकरांची जीभ; प्रसिद्ध खेळाडूच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह विधान