भारतीय संघाने (team india) मागच्या काही वर्षात खूपच अप्रतिम प्रदर्शन केले आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये भारतीय संघ सध्या उत्कृष्ट प्रदर्शन करत आहे. संघातील खेळाडूदेखील एकापेक्षा एक चांगली कामगिरी करत आले आहेत. परंतु बराच काळ उलटून गेला आहे, ज्यामध्ये भारताला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही. एमएस धोनीच्या नेतृत्वात भारताने २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वातील संघ एकाही आयसीसी स्पर्धेत विजय मिळवू शकला नाही. संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर (sunil gavaskar) यांनी याविषयी मत मांडले आहे.
अखेर कोणते असे कारण आहे, ज्यामुळे भारतीय संघाला एवढ्या वर्षांमध्ये एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आली नाही, हा प्रश्न प्रत्येक चाहत्यांच्या मनात आहे. सुनील गावसकरांच्या मते, मधल्या काळात संघात अष्टपैलू खेळाडूंची कमतरता असल्यामुळे भारताला आयसीसी स्पर्धेत यश मिळाले नाही.
एका वृत्तमाध्यामाशी बोलताना गावसकर म्हणाले की, ‘यामध्ये सर्वात मोठे कारण आहे संघात अष्टपैलू खेळाडू नसणे. ते म्हणाले की, “जेव्हा गोष्टी टी२० आणि एकदिवसीय विश्वचषकाची असते, तेव्हा सध्याच्या भारतीय संघात अष्टपैलूंची कमतरता स्पष्टपणे दिसते. जो संघ १९८३ किंवा २०११ विश्वचषक जिंकला होता, एवढेच नाही तर १९८५ जागतिक अजिंक्यपद जिंकणाऱ्या संघात देखील अप्रतिम अष्टपैलूंची कसलीच कमतरता नव्हती.”
“क्रमांक ६, ७ आणि ८ वर अष्टपैलूंची गरज असते आणि या संघात अशा खेळाडूंची कसलीच कमतरता नव्हती, जे फलंदाजीसोबतच गोलंदाजी देखील करू शकत होते. युवराज सिंग आणि सुरेश रैनासारखे खेळाडू खूप चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी करू शकत होते. मागच्या दोन तीन वर्षात भारतीय संघात ही एकमात्र कमतरता आहे. परिणामी, कर्णधाराकडे जास्त पर्याय नव्हते आणि संघात लवचिकतेचा अभाव होता”, असे गावसकर पुढे बोलताना म्हणाले.
दरम्यान, आगामी आयसीसी स्पर्धेचा विचार केला, तर याच वर्षी ऑस्ट्रेलियात टी२० विश्वचषक खेळला जाणार आहे. शुक्रवारी या आगामी टी-२० विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा झाली. भारतीय संघ २३ ऑक्टोबरला विश्वचषक स्पर्धेतील पहिला सामना खेळणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
“आता भुवी तशी जबाबदारी पार पाडत नाही”
शतकांचा नाही पण सचिनचा शुन्यावर आऊट होण्याचा रेकाॅर्ड विराट लवकरच मोडेल; पाहा यादीतील स्थान
व्हिडिओ पाहा –