भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये नुकत्याच झालेल्या टी२० आणि वनडे सामन्यात आयसीसीच्या दोन नियमांमुळे विवादास्पद घटना घडल्या आहेत. पहिला नियम डीआरएसचा अंपायर कॉल आणि दुसरा सॉफ्ट सिग्नलचा नियम. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सुद्धा या दोन्ही नियमांशी सहमत नसल्याने आता आयसीसी दोन्ही नियमांमध्ये बदल करणार असल्याचे सांगितले जात आहे.
क्रिकबजमध्ये छापलेल्या अहवालानुसार, आईसीसी सॉफ्ट सिग्नलच्या नियमांना रद्द करणार असल्याचे म्हटले जात आहे. गुरुवारच्या आयसीसी बोर्डाच्या बैठकीत बीसीसीआय सचिव जय शाहा यांनी सॉफ्ट सिग्नलचा मुद्दा उचलला. त्यांच्या या मुद्द्याचे इतर मंडळानेही समर्थन केले. सर्व सदस्यांनी या नियमात बदल व्हावा असे सांगितले.
माहितीनुसार मेलबर्न क्रिकेट क्लब (एमसीसी) सुद्धा या नियमांशी सहमत नसल्याचे सांगितले जात आहे. एमसीसीच्या वर्ल्ड क्रिकेट कमिटीने अंपायरच्या सॉफ्ट सिग्नल नियमास हटवण्यात यावे अशी मागणी केली आहे. जेव्हा भारत आणि इंग्लंड टी-20 सामन्यादरम्यान डेव्हिड मलानने सूर्यकुमार यादव कॅच पकडला, तेव्हापासून या नियमावरती लक्ष घालण्यात आले. मैदानी अंपायरने सुर्यकुमार यादवला सॉफ्ट सिग्नलखाली आऊट दिले. परंतु तिसऱ्या अंपायरने कॅच पकडला नसल्याचे दाखवले होते. तरीही मैदानी अंपायरने सॉफ्ट सिग्नल दिला असल्याने त्याला आऊट देण्यात आले.
यानंतर टीम इंडियाचे अन्य खेळाडू आणि कर्णधार कोहलीही या नियमाने नाखुष दिसले होते. त्यावेळी समालोचक आकाश चोपडा यांनी नियमात बदल करण्याची त्वरित मागणी केली होती. आकाश चोपडा यांचे म्हणणे असे होते की, ‘अंपायर 70 मीटर दूर पकडलेल्या कॅचवर आउटचा निर्णय कसा देऊ शकतात?’
तसेच विराट कोहलीने अंपायर कॉलच्या नियमातही बदल करण्याची मागणी केली होती. परंतु आयसीसीने मागणी फेटाळून लावली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ युवा खेळाडूंनी शानदार प्रदर्शनाने जिंकले भारतीय दिग्गजाचे मन, दिली टी२० विश्वचषक संघात जागा
कोलकाता नाइट रायडर्ससाठी आनंदची बातमी; ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ खेळाडूचे लवकरच होणार भारतात आगमन