विशाखापट्टणम। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आज(6 ऑक्टोबर) भारताने 203 धावांनी मिळवला. या विजयाबरोबर भारताने 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
विषेश म्हणजे भारताने मागील 6 वर्षांत मायदेशातील हा 24 वा कसोटी सामना जिंकला आहे.
भारताने 1 जानेवारी 2013 पासून मायदेशात आत्तापर्यंत 30 कसोटी सामने खेळले आहेत. या 30 सामन्यांपैकी 24 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तर 5 सामने अनिर्णित राहिले आहेत आणि भारताला केवळ 1 सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे.
भारताने हा एक पराभव फेब्रुवारी 2017 ला पुणे येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात स्विकारला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून स्टिफन ओ किफने 12 विकेट्स घेतल्या होत्या. तर स्टिव्ह स्मिथने दुसऱ्या डावात महत्त्वपूर्ण 109 धावांची खेळी केली होती.
तसेच भारताने मागील 6 वर्षात मायदेशात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडीज, बांगलादेश आणि अफगाणिस्तान संघाबरोबर कसोटी मालिका खेळल्या आहेत. विशेष म्हणजे भारताने यातील एकाही कसोटी सामन्यात पराभव स्विकारलेला नाही.