बुधवारी (29 जानेवारी) सेडन पार्क (Seddon Park) येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना (3rd Match of 5 Matches T20 Series) पार पडला. हा सामना भारताने सुपर ओव्हरमध्ये (Won In Super Over) जिंकला. तसेच मालिकेत 3-0 ने विजयी आघाडीही घेतली आहे.
हा सामना झाल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्या संघातील बाहेर बसलेल्या खेळाडूंविषयी आपले मत व्यक्त केले आहे. तसेच त्याने टी20 मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात संधी न मिळालेल्या खेळाडूंना मालिकेतील उर्वरित सामन्यात संधी दिली जाईल असे सुचवले आहे.
“आम्ही ही मालिका 5-0 च्या फरकाने जिंकण्याचा प्रयत्न करू. वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आणि नवदीप सैनी (Navdeep Saini) यांसारखे काही खेळाडूंना बाहेर बसावे लागले आहे. हे खेळाडू भारतीय संघात खेळण्यासाठी नक्कीच पात्र आहेत.”
“सध्या संघाबाहेर असलेल्या खेळाडूंना पुढील 2 सामन्यात संधी देण्याचा आमचा विचार आहे. आम्ही टी20 मालिकेतील उर्वरित 2 सामने जिंकण्याचा प्रयत्न करू,” असे सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना विराट म्हणाला.
भारताचा न्यूझीलंड विरुद्ध चौथा टी20 सामना 31 जानेवारी रोजी वेलिंग्टन येथे होणार आहे.
रोहित शर्मा म्हणतो, माझ्या षटकारांमुळे नाही तर केवळ या खेळाडूमुळे आम्ही जिंकलो
वाचा????https://t.co/uHnUgOuEXp????#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND @ImRo45— Maha Sports (@Maha_Sports) January 30, 2020
न्यूझीलंडचा संघ, ३ सुपर ओव्हर, ६ महिने आणि तो एकच समालोचक!
वाचा????https://t.co/8UyZkCmBY0????#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND #SuperOver— Maha Sports (@Maha_Sports) January 30, 2020