भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना एमसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. उभय संघांतील या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या फलंदाजांनी तुफान फलंदाजी करत या सामन्यात भारतीय गोलंदाजी चांगलीच फोडून काढली. मात्र, यात भारतीय गोलंदाजांनी नोबॉलच्या रूपाने श्रीलंकेलाच मदत केली. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी तब्बल सात नो-बॉल टाकत एक नकोसा विक्रम नावे करून घेतला.
पहिल्या सामन्याला दुखापतीमुळे मुकलेला युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने या सामन्यातून पुनरागमन केले. मात्र, हे पुनरागमन त्याच्यासाठी विसरण्यासारखे ठरले. आपल्या पहिल्याच षटकात त्याने सलग तीन नो बॉल टाकले. त्यानंतर आपल्या दुसऱ्या षटकातही त्याने दोन नो बॉल टाकत एका टी20 डावात सर्वाधिक नो बॉल टाकण्याचा नकोसा विक्रम नावे करून घेतला. याव्यतिरिक्त शिवम मावी व उमरान मलिक यांनी देखील प्रत्येकी एक नो बॉल टाकत श्रीलंकेला मदत केली.
भारताकडून यापूर्वी एका टी20 सामन्यात सर्वाधिक नो बॉल मागील वर्षी आयर्लंड दौऱ्यावर डब्लिन टी20 मध्ये टाकले गेलेले. त्यावेळी सर्व गोलंदाजांनी मिळून 4 नो बॉल ठाकलेले. तर, 2009 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ख्राईस्टचर्च टी20 व 2022 मध्ये गुवाहाटी टी20 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय गोलंदाजांनी प्रत्येकी तीन नो बॉल टाकलेले.
भारतीय गोलंदाजांच्या या स्वैर गोलंदाजीचा फायदा घेत श्रीलंकेच्या फलंदाजांनी भारतासमोर 207 धावांचे आव्हान ठेवले. दोन्ही सलामीवीरांच्या 80 धावांच्या भागीदारीनंतर कर्णधार दसून शनाकाने अखेरपर्यंत नाबाद राहत 22 चेंडूवर 56 धावा कुटल्या. यामध्ये दोन चौकार व सहा उत्तुंग षटकारांचा समावेश होता.
(Indian Bowlers Bowl Most No Balls In T20I In Pune T20I)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एकीकडे शिवम मावीने गाजवलं मुंबाईचं वानखडे स्टेडियम अन् दुसरीकडे घरी कुटुंबीय…
टीम इंडियाच्या ‘या’ दोन दिग्गजांना आयडल मानतो जितेश; म्हणाला, “त्यांनी मला…”