आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाला आयपीएल २०२०मध्ये संघर्ष करावा लागत आहे. स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच संघातील अनुभवी खेळाडू सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांनी माघार घेतली. त्यानंतर खेळाडूंना सामन्यांदरम्यान खेळाडूंना दुखापतीचा सामना करावा लागला. चेन्नई संघाला या हंगामात ११ सामने खेळताना ८ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशामध्ये कर्णधार एमएस धोनीने आता पुढील वर्षीच्या आयपीएलची तयारी सुरू केल्याचे संकेत दिले आहेत.
शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) मुंबईविरुद्ध मिळालेल्या पराभवानंतर निराश झालेला चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने म्हटले की, उर्विरत तीन सामन्यांमध्ये युवा खेळाडूंची कामगिरी तपासली जाईल.
“पुढच्या वर्षीसाठी बरेच जर आणि तर असतील. आगामी तीन सामन्यांमध्ये युवा खेळाडूंची चाचणी घेण्यात येणार आहे. डेथ ओव्हर्समध्ये कोण चांगली गोलंदाजी करू शकेल आणि दबावात कोण उत्तम फलंदाजी करू शकेल हे आम्ही पाहू. पुढील तीन सामन्यांमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येईल. हे आम्ही पुढील वर्षाच्या दृष्टिकोनातून करत आहोत,” असे धोनी म्हणाला.
धोनी म्हणाला की, “अशा प्रकारच्या कामगिरीमुळे दुःख होते. चूक कोठे झाली ते पहावे लागेल. हे वर्ष संघासाठी काही खास नव्हतं. आठ विकेटने किंवा दहा विकेटने सामना गमावला तरी काही फरक पडत नाही परंतु, स्पर्धेत आम्ही कोणत्या स्थानावर आहोत हे पाहून दुःख वाटते.”
संघाच्या कामगिरीबद्दल बोलताना धोनी म्हणाला, “खराब कामगिरीसाठी बरेच निमित्त दिले जाऊ शकतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सर्वोत्कृष्ट खेळी खेळू शकतो की नाही हे स्वतःलाच विचारावे लागेल की आम्ही आतापर्यंत आमच्या क्षमतेनुसार खेळलो आहे का, नाही. आम्ही प्रयत्न केला पण यशस्वी झालो नाही.”
चेन्नई संघाने आतापर्यंत खेळलेल्या ११ सामन्यात केवळ ३ सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे ते गुणतालिकेत केवळ ६ गुणांसह सर्वात शेवटच्या स्थानी आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-चेन्नईविरुद्ध एकहाती सामना जिंकवून देणारा ईशान किशन म्हणतो, ‘त्या’ खेळाडूकडून नेहमीच शिकायला मिळते
‘-पॉवरप्लेमध्येच खेळ संपला होता’, मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर चेन्नईच्या प्रशिक्षकांचे मोठे भाष्य
ट्रेंडिंग लेख-
-‘त्याच’ नाव जरी घेतलं तरी लोकं म्हणायचे, ‘यावर्षी किती कोटी रुपये?’
-“कॅप्टन! मी उद्या वर्ल्डकप फायनल खेळणार आहे”, बोट तुटलेले असतानाही ‘तो’ मैदानात उतरला