भारत विरुद्ध श्रीलंंका (INDvSL) यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा वनडे सामना गुरुवारी (12 जानेवारी) खेळला गेला. नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाला या सामन्यात गोलंदाजीची संधी मिळाली. या सामन्यातून संघात पुनरागमन करत असलेल्या फिरकीपटू कुलदीप यादव याने शानदार गोलंदाजी करत श्रीलंकेला 215 धावांवर गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
गुवाहाटी येथील पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ ईडन गार्डन येथे मालिका विजयाच्या इराद्याने मैदानात उतरला. भारताने या सामन्यासाठी युजवेंद्र चहल याच्या जागी कुलदीप यादवला संधी दिली. श्रीलंकेला पुन्हा एकदा या सामन्यात सुरुवात देण्याचा प्रयत्न अविष्का फर्नांडो व पदार्पण करणाऱ्या नुवानिदू फर्नांडो यांनी केला. अविष्का वेगवान 20 धावा काढून बाद झाला. त्यानंतर नुवानिदू व कुसल मेंडीस यांनी 73 धावांची भागीदारी केली. त्यानंतर मात्र भारतीय फिरकीपटूंनी सामन्यावर वर्चस्व गाजवले. श्रीलंकेने पुढील पाच बळी केवळ 24 धावांमध्ये गमावले. कुलदीपने तीन तर उमरान मलिकने दोन बळी आपल्या नावे केले.
त्यानंतर भारताच्या गोलंदाजांना फारसे यश मिळाले नाही. श्रीलंकेच्या खालच्या फळीतील जवळपास सर्वच फलंदाजांनी योगदान दिले. हसरंगाने 21, करूणारत्नेने 17, वेललागेने 32 व कसून रजिथाने नाबाद 17 धावांचे योगदान दिले. भारतासाठी कुलदीप यादव व मोहम्मद सिराज यांनी सर्वाधिक तीन बळी आपल्या नावे केले. तर मलिकने दोन बळी मिळवण्यात यश मिळवले.
(Kuldeep and Siraj restricted srilanka on 215 in Kolkata ODI)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीला हटवून विराटल हवी होती टीम इंडियाची कॅप्टन्सी! माजी प्रशिक्षकाच्या दाव्याने खळबळ
‘जय शाह सर…’, रणजीमध्ये विक्रमी खेळी केल्यानंतर पृथ्वी शॉचा बीसीसीआय सचिवांना रिप्लाय