आयपीएल २०२० चा शेवटचा साखळी सामना मंगळवारी (३ नोव्हेंबर) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात झाला. या सामन्यात हैदराबादने मुंबईला १० विकेट्सने पराभूत करत प्ले ऑफमध्ये दिमाखात एन्ट्री केली. यासोबतच हैदराबाद संघाने मुंबई आणि चेन्नई सुपर किंग्जसारख्या बलाढ्य संघाची बरोबरी केली आहे.
नाणेफेक जिंकत हैदराबादने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना ८ विकेट्स गमावत १४९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना हैदराबादचे शिलेदार डेविड वॉर्नर आणि वृद्धिमान साहा यांनी तडाखेबंद अर्धशतके ठोकत १७.१ षटकातच १५१ धावा करत संघाला विजय मिळवून दिला.
हंगामाची सुरुवात करणाऱ्या हैदराबाद संघाने शेवटच्या साखळी सामन्यात मुंबईविरुद्ध एवढा मोठा विजय मिळवत आयपीएल इतिहासात २ वेळा १० विकेट्सने सामना जिंकण्याचा पराक्रम केला आहे. चेन्नई आणि मुंबई संघांनीही आयपीएल इतिहासात २ वेळा १० विकेट्सने सामना जिंकण्याचा कारनामा केला आहे.
या यादीत अव्वल क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आहे. त्यांनी आतापर्यंत ३ वेळा १० विकेट्सने सामना जिंकला आहे. यासोबतच राजस्थान रॉयल्स, डेक्कन चार्जर्स, दिल्ली डेअरडेविल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब संघांनी प्रत्येकी एक वेळा १० विकेट्सने सामना जिंकला आहे.
आयपीएल इतिहासात सर्वाधिकवेळा १० विकेट्सने विजय मिळवणारे संघ
३ वेळा- रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
२ वेळा*- सनरायझर्स हैदराबाद
२ वेळा- मुंबई इंडियन्स
२ वेळा- चेन्नई सुपर किंग्ज
१ वेळा- राजस्थान रॉयल्स
१ वेळा- डेक्कन चार्जर्स
१ वेळा- दिल्ली डेअरडेविल्स
१ वेळा- कोलकाता नाईट रायडर्स
१ वेळा- किंग्ज इलेव्हन पंजाब
महत्त्वाच्या बातम्या-
-बिगुल वाजलं! प्ले ऑफमध्ये चार संघांचे स्थान निश्चित; ‘असे’ असतील क्वालिफायर आणि एलिमिनेटरमधील सामने
-IPL 2020 : हैदराबादविरुद्ध पराभूत होऊनही मुंबईचा ‘खास’ पराक्रम; घातली दुसऱ्या क्रमांकाला गवसणी
-मुंबईचे प्रयोग फसले! हैदराबादविरुद्धच्या दारुण पराभवानंतर रोहितची निराशाजनक प्रतिक्रिया, म्हणाला…
ट्रेंडिंग लेख-
-‘हे’ ३ संघ कधीही राहिले नाही गुणतालिकेत शेवटच्या स्थानी, तर दिल्ली संघ मात्र…
-IPL 2020 : कोलकाताच्या ‘या’ पाच खेळाडूंपुढे राजस्थानने टेकले गुडघे
-वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?