बहुप्रतिष्ठित टी२० लीग म्हणजेच आयपीएल २०२०मधील शेवटचा साखळी सामना मंगळवारी (३ नोव्हेंबर) झाला. हा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स संघात झाला. हा सामना हैदराबादने १० विकेट्सने जिंकला. हा सामना जिंकत हैदराबादने प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईला या सामन्यात पराभव स्विकारावा लागला असला तरी मुंबईच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२० मध्ये एकूण १४ सामने खेळले. त्यांनी यांपैकी ९ सामन्यात विजय मिळवला, तर उर्वरित ५ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. शेवटच्या साखळी सामन्यात पराभूत होऊनही मुंबईचा रनरेट सर्वाधिक +१.१०७ इतका आहे.
आयपीएलच्या एका हंगामात कोणत्याही संघाने स्थापित केलेला हा सर्वाधिक रनरेट आहे.
मुंबईने हैदराबादच्या सामन्यापूर्वीच आयपीएल २०२० च्या प्लेऑफमध्ये उडी घेतली होती. मुंबईने आतापर्यंत आयपीएलचे सर्वाधिक ४ विजेतेपद आपल्या नावावर केले आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ या हंगामात आयपीएलचे विजेतेपद जिंकले होते. त्यानंतर आता ते आयपीएल २०२० चे विजेतेपदही जिंकण्याच्या हेतूने मैदानात उतरतील.
मुंबईचा पुढील सामना गुरुवारी (५ नोव्हेंबर) क्वालिफायर-१ मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-IPL 2020 : हैदराबादविरुद्ध पराभूत होऊनही मुंबईचा ‘खास’ पराक्रम; घातली दुसऱ्या क्रमांकाला गवसणी
-मुंबईचे प्रयोग फसले! हैदराबादविरुद्धच्या दारुण पराभवानंतर रोहितची निराशाजनक प्रतिक्रिया, म्हणाला…
-मुंबईला पराभवाची धूळ चारत हैदराबाद प्लेऑफमध्ये दाखल, वॉर्नर आणि साहा यांची अर्धशतके
ट्रेंडिंग लेख-
-‘हे’ ३ संघ कधीही राहिले नाही गुणतालिकेत शेवटच्या स्थानी, तर दिल्ली संघ मात्र…
-IPL 2020 : कोलकाताच्या ‘या’ पाच खेळाडूंपुढे राजस्थानने टेकले गुडघे
-वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?