टी-२० मालिकेनंतर भारत आणि न्यूझीलंडमध्ये २ सामन्याच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना गुरुवारीपासून (२५ नोव्हेंबर) कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियममध्ये खेळला जात आहेत. कानपूरच्या या ग्रीन पार्क स्टेडियमवर जवळपास पाच वर्षांनंतर एखादा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना आयोजित केला गेला आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी चाहते देखील स्टेडियममध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. अशात पहिल्या दिवशी सामन्यादरम्यान प्रेक्षकांच्या गर्दीत पाकिस्तान मुर्दाबाद असे नारे दिले गेले.
सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताचा डाव सुरू झाल्यानंतर जवळपास अर्ध्या तासाने ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ अशी घोषणाबाजी सुरू झाली. प्रेक्षकांनी या घोषणेने भारतीय संघाचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला.
त्याव्यतिरिक्त प्रेक्षकांकडून ‘जितेगा भाई जितेगा, भारत जितेगा,’ असेही नारे देण्यात आले. सामन्यायादरम्यान काही मोजक्या लोकांनी जोरजोरात पाकिस्तान विरोधी नारे दिले आणि त्यानंतर इतर प्रेक्षकांनी त्याची साथ दिली. त्यानंतर या प्रेक्षकांनी भारत माता की जय आणि वंदे मातर असे देशभक्ती दाखवणारे नारे देखील दिले.
https://twitter.com/pant_fc/status/1463738233364250626?s=20
दरम्यान, कसोटी समान्याचा पहिल्या दिवसाच्या अखेरीस भारतीय संघाने २५८ धावा केल्या. भारताने या धावा ८४ षटकांमध्ये आणि चार विकेट्सच्या नुकसानावर केल्या. सलामीवीर शुभमन गिलने ५२ धावा केल्या, ज्यामध्ये त्याच्या पाच चौकार आणि एका षटकाराचा समावेस आहे. त्याव्यतिरिक्त अष्टपैलू रवींद्र जडेजाने ५० आणि श्रेयस अय्यरने सर्वाधिक ७५ धावा केल्या. जडेजा आणि अय्यरने शतकी भागिदारी केली असून खेळपट्टीवर कायम आहेत.
न्यूझीलंडसाठी काइल जेमिसनने अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताच्या तीन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. त्याने घेतलेल्या विकेट्समध्ये भारताचे दोन्ही सलामीवीर मयंक अगरवाल (१३) आणि शुभमन गिल (५२) यांचा आणि कर्णधार अजिंक्य रहाणेचा (३५) समावेश आहे. त्याव्यतिरिक्त न्यूझीलंडसाठी टिम साउदीने एक विकेट घेतला. भारताचा अनुभवी चेतेश्वर पुजार टिम साउदीच्या गोलंदाजीवर २३ धावा करून बाद झाला.
महत्त्वाच्या बातम्या-
कानपूर कसोटी सुरू असताना श्रीलंकेचा भारताला धक्का, WTC च्या गुणतालिकेत केले ‘ओव्हरटेक’
भारताला नडणाऱ्या किवी गोलंदाजाला शुभमनने ठोकला कडक षटकार, कपिल यांची करुन दिली आठवण