सध्या देशभरातील विविध शहरांमध्ये रणजी ट्रॉफीचे सामने खेळले जात आहेत. स्पर्धेच्या पहिल्या फेरीतील तीन सामन्यात पराभूत होऊन तमिळनाडू संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे पुढील हंगामाच्या दृष्टीने तयारी करण्याकरिता तमिळनाडू क्रिकेट संघटनेने आपला कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आता उर्वरित हंगामासाठी संघाचे नेतृत्व युवा फिरकीपटू आर साईकिशोर हा करताना दिसेल.
देशांतर्गत क्रिकेटमधील एक मजबूत संघ म्हणून तामिळनाडू संघाकडे पाहिले जाते. मात्र, यंदाच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत त्यांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. बाबा अपराजित याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या संघाला पहिल्यांदा आंध्र प्रदेशकडून पराभूत व्हावे लागले होते. त्यानंतर मुंबई व महाराष्ट्राने देखील त्यांचा पराभव केला. याच कारणाने संघटनेने अपराजित याच्याकडून नेतृत्व काढून घेतले. मागील दोन हंगामात तमिळनाडूने बदललेला हा तिसरा कर्णधार आहे. अपराजित याच्याआधी विजय शंकर संघाचे नेतृत्व करत होता.
साई किशोर हा डावखुरा फिरकी गोलंदाज तसेच उपयुक्त फलंदाज म्हणून ओळखला जातो. आयपीएलमध्ये तो हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्ससाठी खेळतो. याआधी दोन वर्ष चेन्नई सुपर किंग्स संघातही त्याला स्थान मिळालेले. मात्र, चेन्नईचा तत्कालीन कर्णधार एमएस धोनी याच्याकडून त्याला पुरेशी संधी मिळाली नव्हती.
कर्णधारपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना साईकिशोर म्हणाला,
“एक खेळाडू म्हणून मी नेहमीच उत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे. आता नेतृत्वाची जबाबदारी देखील मिळाली. संघावर कोणताही दबाव नाही. आणखी उत्तम कामगिरी करत आम्ही परिणाम बदलण्याचा प्रयत्न करू.”
त्याने तमिळनाडूसाठी आत्तापर्यंत 26 सामन्यात 93 बळी मिळवले आहेत. तर, लिस्ट ए मध्ये 41 सामन्यात 62 व टी20 मध्ये 57 बळी आपल्या नावे केले.
(R Sai Kishore Appointed As Tamilnadu Captain)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सरफराज तोंडाने नाही, तर बॅटने बोलतोय; राष्ट्रीय संघात संधी न मिळाल्यानंतर पुन्हा ठोकले शतक
टीम इंडियाच्या माजी कर्णधारावर गुन्हा दाखल; महाराष्ट्रातील बड्या राजकीय नेत्याशी संबंध