शुक्रवारी (१ ऑक्टोबर) इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत रोमांचक सामना पार पडला. हा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाच्या असलेल्या या सामन्यात अनेक रोमांचक गोष्टी घडल्या. परंतु शेवटच्या षटकात एक मोठी चूक घडली, जी घडली नसती तर कदाचित सामन्याचे चित्र काही वेगळेच असते.
क्रिकेटमध्ये झेल टिपणे अतिशय गरजेचे असते. ते म्हणतात ना, ‘झेल टिपा आणि सामना जिंका’. हे अगदी खरं आहे. कारण राहुल त्रिपाठीने शेवटच्या षटकात तो झेल सोडला नसता, तर कोलकाता नाईट रायडर्स संघाचा विजय निश्चित होता, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. आता या पराभवानंतर कोलकाता नाईट रायडर्स संघाची प्लेऑफमध्ये पोहचण्याची वाट आणखी कठीण झाली आहे. राहुल त्रिपाठीने सोडलेल्या एका झेलमुळे कोलकाता नाईट रायडर्स संघाला सामना तर गमवावा लागलाच, तसेच गुणतालिकेत २ गुणांनी आघाडी घेण्याची संधी देखील हुकली.
तर झाले असे की, शेवटच्या षटकात पंजाब किंग्स संघाला विजय मिळवण्यासाठी ५ धावांची आवश्यकता होती. परंतु पंजाब किंग्स संघाने हे हलक्यात घेतले नव्हते. कारण राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्यांना शेवटच्या षटकात पराभवाचा सामना करावा लागला होता. दरम्यान शेवटच्या षटकात व्यंकटेश अय्यरने केएल राहुलला बाद केल्यानंतर त्यांची चिंता आणखी वाढली होती.
त्यानंतर पुढील चेंडूवर शाहरुख खानने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु चेंडू हवेत असताना, तो सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या राहुल त्रिपाठीच्या हाती जाणार असे वाटू लागले होते. परंतु त्याने तो झेल सोडला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. ज्यामुळे पंजाब किंग्स संघाने या सामन्यात विजय मिळवला.
इथे पाहा व्हिडिओ-
https://www.iplt20.com/video/242751/m45-kkr-vs-pbks-shahrukh-khan-six?tagNames=indian-premier-league
या सामन्यात पंजाब किंग्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून प्रथम फलंदाजी करताना व्यंकटेश अय्यरने सर्वाधिक ६७ धावांची खेळी केली. तर राहुल त्रिपाठीने ३४ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्स संघाला २० षटक अखेर ७ बाद १६५ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्स संघाकडून केएल राहूलने सर्वाधिक ६७ तर मयंक अगरवालने ४० धावांची खेळी करत हा सामना पंजाब किंग्स संघाला ५ गडी राखून जिंकून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
जेव्हा अश्विनला तसा जल्लोष केल्याने खावे लागले होते धोनीचे बोलणे, सेहवागने सांगितला जुना किस्सा
कोहलीकडून धडे घेतल्यानंतर जयस्वाल होणार ‘यशस्वी’, मोठी खेळी करण्यासाठी मिळालाय ‘हा’ गुरूमंत्र