भारतीय महिला क्रिकेट संघाची अनुभवी फिरकीपटू राजेश्वरी गायकवाड हिने आपला संघ सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकेल असा विश्वास व्यक्त केला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. त्यावेळी भारताला अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला.
आयसीसी क्रमवारीत वरच्या क्रमांकावर असल्याने भारतीय संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत थेट उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. राजेश्वरी गायकवाडने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना आशियाई खेळांबाबत आपले मत व्यक्त केले. राजेश्वरी म्हणाली,
“नक्कीच आम्ही या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकू. आम्ही या सर्व संघांविरुद्ध यापूर्वी चांगले खेळलो आहे. आम्हाला आमच्या संघावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही सुवर्णपदकासह भारतात येऊ.”
यासोबतच तिने आपल्या दुखापती विषयी देखील महत्त्वाची माहिती दिली. ती म्हणाली,
“बांगलादेश दौऱ्यावर मला संघातून बाहेर केले गेले नव्हते तर दुखापतग्रस्त असल्याने रिहॅबमध्ये मी वेळ घालवला. एशियन गेम्समध्ये मी नक्कीच चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल.”
चीनमधील हॅंगझू येथे 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत एशियन गेम्स खेळले जाणार आहेत. यामध्ये प्रथमच क्रिकेटचा समावेश केला गेला असून, भारताचे पुरुष आणि महिला असे दोन्ही संघ खेळतील. भारताच्या पुरुष संघाचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड याच्याकडे देण्यात आले आहे.
एशियन गेम्ससाठी भारतीय संघ-
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, देविका वैद्य, अंजली सरवानी, तीतस साधू, राजेश्वरी गायकवाड, मिन्नू मनीका, राजेश्वरी गायकवाड. कनिका आहुजा, उमा छेत्री (यष्टीरक्षक), अनुषा बरेड्डी
(Rajeshwari Gaekwad Said We Will Win Gold Medal In Asian Games)
महत्वाच्या बातम्या-
विराट कोहली का खेळत नाही T20 क्रिकेट? कर्णधार रोहितने सांगूनच टाकले कारण, वाचाच!
रोहितलाच नाही स्वतःच्या निवडीची गॅरंटी! म्हणाला, “प्रत्येकाला संघर्ष करावा लागेल”