भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री हे पुन्हा एकदा समालोचक आणि समीक्षक या आपल्या जुन्या रूपात परतले आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण विधाने केली आहेत. हार्दिक पांड्याच्या निवृत्तीबद्दलही ते बोलले. त्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये फक्त सहा संघांना खेळायची कल्पना त्यांनी मांडली. त्यानंतर आता वनडे क्रिकेटच्या भवितव्याबाबत त्यांनी एक मोठे विधान केले आहे.
आजकाल क्रिकेटमध्ये ज्या गोष्टीची सर्वाधिक चर्चा होते ती म्हणजे वनडे क्रिकेट. वनडे क्रिकेटची लोकप्रियता, उपयुक्तता आणि भविष्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पाकिस्तानचे महान वेगवान गोलंदाज वसीम अक्रम यांनी तर क्रिकेटचा हा प्रकार बरखास्त करण्याची मागणी केली होती. या दरम्यान काही माजी क्रिकेटपटू असे आहेत त्यांना हा प्रकार हवा आहे. त्यांनी फक्त या प्रकारात काही बदल करणे काळाची गरज असल्याचे म्हटले आहे.
माजी भारतीय प्रशिक्षक व प्रसिद्ध समालोचक रवी शास्त्री यांनीदेखील वनडे क्रिकेटच्या भविष्याबद्दल बोलताना म्हटले,
“वनडे क्रिकेटला वाचवण्याचा एक मार्ग मला दिसत आहे. तो मार्ग म्हणजे आता वनडे क्रिकेट ५० ऐवजी ४० षटकांचे करण्यात यावे.”
टी२० आल्यानंतर अनेकांनी प्रश्न उपस्थित केला होता की, हे कसोटी क्रिकेटसाठी धोकादायक असेल. मात्र, सध्या परिस्थिती अशी आली आहे की, वनडे क्रिकेट बंद होण्याच्या मार्गावर आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी यानेदेखील आता वनडे क्रिकेटमध्ये बदल करण्याची गरज असल्याचे म्हटलेले. त्याने देखील शास्त्री यांच्याप्रमाणे वनडे क्रिकेट ४० षटकांचे करण्याचा सल्ला दिला होता.
ही सर्व चर्चा इंग्लंडचा कसोटी कर्णधार व २०१९ विश्वचषकाचा नायक ठरलेल्या बेन स्टोक्सने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सुरू झाली होती. त्याने अतिक्रिकेटचे कारण सांगत ३१ व्या वर्षीच वनडे क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतलेला. इतरही काही खेळाडूंनी सध्या जास्त प्रमाणात क्रिकेट होत असल्याचे कबूल केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टी-२० विश्वचषक २००७ गाजवणारा भारताचा हिरो, आता ‘या’ स्पर्धेतही चमकणार?
‘त्याच्याकडे खूप प्रतिभा आहे’, ‘या’ भारतीय दिग्गजाने गायले हुड्डाचे गुण