इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना लीड्सच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात इंग्लंड संघाने पहिल्या दोन अप्रतिम कामगिरी करत पहिल्या डावात ३५४ धावांची आघाडी घेतली होती. प्रत्युत्तरात भारतीय संघाने देखील जोरदार कामगिरी करत सामन्यात पुनरागमन केले आहे.
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (२६ ऑगस्ट) रोहित शर्माने अर्धशतक झळकावले. त्यानंतर तो बाद झाला. तो शतक झळकावण्यात अपयशी ठरला असला तरी देखील त्याने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
इंग्लंड संघाने पहिल्या डावात ४३२ धावांचा डोंगर उभारला होता. यासह ३५४ धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळे भारतीय संघाच्या चिंतेत वाढ झाली होती. दरम्यान लॉर्ड्समध्ये शतक झळकावणारा फलंदाज केएल राहुल देखील अवघ्या ८ धावा करत माघारी परतला होता.
त्यानंतर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनी डाव सावरत भारतीय संघाला पुनरागमन करून दिले होते. त्याने या डावात १५६ चेंडुंमध्ये ७ चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने ५९ धावांची खेळी केली. यासह तो इंग्लंडमध्ये भारतीय संघासाठी दोन्ही डावात १०० पेक्षा अधिक चेंडू खेळणारा तिसरा सलामीवीर फलंदाज ठरला आहे..
इंग्लंड विरुद्ध सुरू असलेली तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाचा संपूर्ण डाव ७८ धावांवर संपुष्टात आला होता. या डावात रोहित शर्माने सर्वाधिक १९ धावांची खेळी केली होती. यादरम्यान त्याने १०५ चेंडूंचा सामना केला होता. तसेच दुसऱ्या डावात त्याने १५६ चेंडुंचा सामना करत ५९ धावा केल्या. यापूर्वी असा कारनामा सुनील गावसकर आणि मुरली विजय यांनी केला होता.(Rohit Sharma is third Indian Batsman after Sunil gavaskar and Murali Vijay to face hundred balls in both innings in England)
भारतीय संघाचे जोरदार पुनरागमन
इंग्लंड संघाने ३५४ धावांची आघाडी घेतल्यानंतर भारतीय संघाचे सामन्यात पुनरागमन करणे कठीण झाले होते. दरम्यान, केएल राहुल देखील अवघ्या ८ धावा बाद करून माघारी परतला होता. परंतु त्यानंतर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनी भागीदारी करत डाव सावरला. परंतु चांगली सुरुवात मिळाल्यानंतर रोहित शर्माला मोठी खेळी साकारता आली नाही. तो ५९ धावा करत पॅव्हेलियनमध्ये परतला.
नंतर पुजाराला कर्णधार विराट कोहलीने साथ देत डाव पुढे नेला. त्यांनी तिसऱ्या दिवसाखेर नाबाद ९९ धावांची भागीदारी केली. तिसऱ्या दिवसाखेर भारताने २ बाद २१५ धावा केल्या. विराट ४५, तर पुजारा ९१ धावांवर नाबाद आहेत. भारत अजूनही १३९ धावांनी पिछाडीवर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
टोकियो ऑलिम्पिकच्या सुवर्णपदकावरील थर उतरतोय? चीनी खेळाडूचा खबळजनक खुलासा
परदेशात कधी येणार हिटमॅनचे शतक? रोहितने नको असलेल्या यादीत गाठले चौथे स्थान
संधी मिळत नसल्याने अश्विनने सुरू केली डाव्या हाताने फलंदाजी, ट्विटर पोस्ट करताना लिहिले…