इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील चौथा कसोटी सामना गुरुवारपासून (२ सप्टेंबर) सुरू झाला आहे. पहिल्या डावात भारतीय फलंदाजांची खेळी अत्यंत निराशाजनक राहिली. शार्दुल ठाकूर आणि कर्णधार कोहली यांचे अर्धशतक वगळता इतर कोणत्याही भारतीय फलंदाज इंग्लिश गोलंदाजांसमोर टिकू शकला नाही. मात्र दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी दमदार पुनरागमन केले. एवढेच नाहीतर सलामीचा फलंदाज रोहित शर्माने एक शानदार शतक देखील ठोकले. यासह भारताबाहेर रोहितचे हे पहिलेच शतक ठरले.
पहिल्या डावात भारतीय संघ ९९ धावांनी पिछाडीवर पडला होता. यानंतर दुसऱ्या डावात रोहितने केएल राहुलसोबत मिळून पहिल्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी केली. मात्र नंतर राहुल अँडरसनच्या गोलंदाजीवर ४६ धावांवर बाद झाला.
नंतर रोहितने देखील शानदार खेळी केली. रोहितने ९४ धावांवर असताना ६४ व्या षटकात मोइन अलीच्या गोलंदाजीवर लॉंग ऑनला एक षटकार मारला. या षटकारासह रोहितने या मालिकेतील, तसेच भारताबाहेरील आपले पहिले शतक पूर्ण केले. एवढेच नाही, तर रोहितने अनेक विक्रम देखील प्रस्थापित केले.
First century outside India for the Hitman! ????
He gets there with a monster six over long on!Tune into Sony Six (ENG), Sony Ten 3 (HIN), Sony Ten 4 (TAM, TEL) & SonyLIV (https://t.co/AwcwLCPFGm ) now! ????#ENGvINDOnlyOnSonyTen #BackOurBoys #RohitSharma pic.twitter.com/4HDSE276Ow
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 4, 2021
षटकार मारून आपले शतक पूर्ण करणाऱ्यांमध्ये रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने गौतम गंभीरचा विक्रम मोडून ३ वेळा षटकार मारून आपले शतक पूर्ण केले. याआधी गंभीरने दोन वेळा षटकार मारून आपले शतक पूर्ण केले होते. असा कारनामा करणाऱ्यांमध्ये अव्वल स्थानात भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर आहे. तेंडुलकरने ६ वेळा षटकार मारत आपले शतक पूर्ण केले होते.
तसेच रोहितने चालू २०२१ वर्षात १००० धावांचा टप्पा पार केला आहे. तसेच २०२१ मध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये देखील रोहितने अव्वल स्थान पटकावले. त्याचबरोबर रोहितने इंग्लंडमध्ये २००० वा करण्याचा देखील पराक्रम केला आहे.
दरम्यान, पहिल्या डावात झालेल्या खराब सुरुवातीनंतर दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी विशेष करून रोहित शर्माने शानदार फलंदाजी केली. ज्यामुळे सध्या भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. रोहित शर्माने १२७ धावांची आणि चेतेश्वर पुजाराने ६१ धावांची खेळी केली. तिसऱ्या दिवसाखेर भारताने ९२ षटकांत ३ बाद २७० धावा केल्या असून १७१ धावांची आघाडी घेतली आहे. विराट कोहलीने २२ धावांवर आणि रविंद्र जडेजा ९ धावांवर नाबाद आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–बाद की नाबाद? ‘या’ कारणामुळे केएल राहुलच्या विकेटवर वादाला सुरुवात
–क्या बात है! क्रिकेटमध्ये अवघड वाटणाऱ्या ५ विक्रमांपैकी दोन आहेत भारतीयांच्या नावावर
–लोकल बॉय इन ॲक्शन! केएल राहुलला अँडरसनने ‘असं’ बाद करत इंग्लंडला मिळवून दिली पहिली विकेट