मंगळवारी (7 जानेवारी) इंदोर येथे भारत विरुद्ध श्रीलंका संघात 3 सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय टी20 मालिकेतील दुसरा सामना पार पडला. हा सामना भारताने 7 विकेट्सने जिंकला.
या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने चांगली कामगिरी केली. यामध्ये त्याने 23 धावा देत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या आहेत.
त्याचबरोबर सामना संपल्यानंतर आपल्या आंतरराष्ट्रीय टी20 कारकीर्दीतील अनुभवाबद्दल बोलताना शार्दूल म्हणाला की, “मला असे वाटते की टी20 क्रिकेट प्रकार खूप लहान असून यामध्ये नेहमी चढ- उतार पहायला मिळतात. तुम्ही जितके सामने खेळाल तितका जास्त अनुभव मिळवाल आणि कसोटी क्रिकेट हा एक असा क्रिकेट प्रकार आहे ज्यामध्ये तुमच्याकडे विचार करण्यासाठी वेळ असतो. परंतु टी20 मध्ये तुमच्याकडे एवढा वेळ नसतो.”
“जेव्हा तुम्ही सराव करता तेव्हा तुमच्यातील मजबूत पैलूंना आणखी मजबूत बनवायचे असते. तसेच आपल्यातील कौशल्यांमध्ये सुधार करायचा असतो. अशाच प्रकारे मी सरावादरम्यान माझ्यातील कौशल्ये सुधारत आहे आणि त्यामध्ये सुधारणा करत आहे. मागील 2-3 वर्षांतील आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळल्यामुळे माझी खेळी चांगली झाली आहे,” असेही शार्दूल यावेळी म्हणाला.
शार्दूलने या सामन्यातील 19 व्या षटकात 3 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच यापूर्वी त्याने आपला पहिला आंतरराष्ट्रीय टी20 सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 22 महिन्यांपूर्वी खेळला होता. त्यात त्याने 1 विकेट घेतली होती.
श्रेयस अय्यरच्या 'त्या' षटकारावर अशी होती कॅप्टन कोहलीची रिऍक्शन
वाचा????https://t.co/DJlYwHrF66????#म #मराठी #Cricket #INDvSL #TeamIndia @imVkohli @ShreyasIyer15— Maha Sports (@Maha_Sports) January 8, 2020
बुमराहचे पुनरागमन म्हणजे विक्रम तर होणारच!
वाचा????https://t.co/GP9HYANBQ4????#म #मराठी #Cricket #INDvSL @Jaspritbumrah93— Maha Sports (@Maha_Sports) January 8, 2020