भारतीय क्रिकेटमध्ये सध्या युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याचे नाव अत्यंत चर्चेत आहे. मागील वर्षी देशांतर्गत हंगाम तसेच यावर्षी आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर त्याला भारतीय संघासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली. आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध 171 धावांची लाजवाब खेळी करत सर्वांचे मन जिंकले. त्याच्या या शानदार फॉर्मचा फायदा करून घेण्यासाठी भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी त्याला विश्वचषकात खेळवण्याची मागणी केली आहे.
यशस्वी मागील वर्षभरापासून शानदार फॉर्ममध्ये दिसून आला आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील सर्व स्पर्धांमध्ये त्याने शतके ठोकली. आयपीएलच्या सोळाव्या हंगामात त्याची बॅट चांगलीच तळपली. त्याने स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक या हंगामात झळकावले. तसेच सहाशे पेक्षा जास्त धावा करून तो स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट युवा खेळाडू ठरला. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय पदार्पणातही पहिल्या दोन सामन्यांमध्ये सर्वाधिक केल्यानंतर गांगुली यांनी त्याचे कौतुक केले. गांगुली म्हणाले,
“यशस्वी मला एक तांत्रिकदृष्ट्या चांगला फलंदाज वाटला. त्याचबरोबर डावखुऱ्या हाताचा असल्याने तो संघाला मजबुती प्राप्त करून देतो. विश्वचषकासाठी भारतीय संघातील बऱ्याचशा जागा आता भरलेल्या आहेत. मात्र, निवड समितीने त्याला संघात जागा देण्यास काही हरकत नाही.”
गांगुली यांनी अप्रत्यक्षपणे निवड समिती व निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांना एक प्रकारे सल्ला दिल्याचे म्हटले जाते.
विश्वचषकासाठी रोहित शर्मा, विराट कोहली, शुबमन गेल्या तीन जणांचे वरच्या फळीत खेळणे नक्की आहे. मधल्या फळीत कोण खेळणार याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. कारण, केएल राहुल व श्रेयस दुखापतग्रस्त असून ते विश्वचषकासाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहेत का हे पाहणे गरजेचे ठरेल. त्याचवेळी, संजू सॅमसन व ईशान किशन यापैकी एकाची पाचव्या क्रमांकावर वर्णी लागू शकते.
(Sourav Ganguly Said Include Yashasvi Jaiswal In ODI World Cup Sqaud)
महत्वाच्या बातम्या –
वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख बदलणार? बीसीसीआयकडून झाली मोठी गफलत
नव्या वर्षात इंग्लंड दाखवणार भारतात बॅझबॉल! खेळणार पाच सामन्यांची टेस्ट सिरीज