भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरस दिसून येत आहे. या सामन्यातील क्रिकेट सोबतच डीआरएसमुळे देखील क्रिकेट वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी(28 डिसेंबर) ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनला डीआरएसमध्ये विवादात्मक रित्या बाद देण्यात आल्याने ऑस्ट्रेलिया संघ नाराज दिसत आहे.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मॅथ्यू वेड म्हणाला, ‘माझ्यामते कालच्या दिवसातील पहिल्या चेंडूवर पुजारा सोबत घडलेला प्रकार व पेनचा प्रकार समान आहे. पुजाराला त्यावेळी नाबाद देण्यात आले, मात्र यावेळी पेनला बाद दिले गेले. मी स्लीपमध्ये उभा असल्याने चेंडू पुजाराच्या बॅटला स्पर्श करून गेल्याचे मला दिसले, त्यामुळेच आम्ही रिव्यू घेतला होता. जेव्हा दोन्ही ठिकाणी समान प्रकार घडत असेल तेव्हा निर्णय देखील दोन्ही ठिकाणी समान असावेत.’
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात रवींद्र जडेजा गोलंदाजी करत असताना कर्णधार टीम पेन एक फटका मारण्यात फसला, यावेळी पंतने चेंडू पकडल्यानंतर संपूर्ण भारतीय संघाने अपील करण्यास सुरुवात केली. अंपायरने पेनला नाबाद घोषित केल्यानंतर, कर्णधार अजिंक्य रहाणेने काही क्षणातच डीआरएसची मागणी केली.
डीआरएसमध्ये दिसले की, चेंडू जेव्हा पेनच्या बॅट जवळून जात होता, तेव्हा थोडासा आवाज झाला. त्यामुळे अंपायरने पेनला बाद घोषित केले. पेनच्या निर्णयाबाबत वाद होण्याचे आणखी एक कारण म्हणजे, सामन्याच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या चेंडूवर पुजारा संदर्भातही असाच प्रकार घडला होता. मात्र त्यावेळी पुजाराला नाबाद दिले गेले होते. डीआरएस बाबत अनेक क्रिकेट पंडित नाराजी व्यक्त करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
असा प्रामाणिक क्रिकेटर होणे नाही! नाबाद असतानाही सोडलं मैदान
झहिर म्हणतो, ‘असे’ जर झाले तर भारताला २५ रिव्ह्यू घ्यावे लागलीत