कोरोना या साथीच्या आजारामुळे भारतात बरेच दिवस क्रिकेट स्पर्धांचे आयोजन होऊ शकले नाही. मात्र सर्व खबरदारी घेऊन कोलकाता येथे ‘बंगाल टी20 चॅलेंज’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. मंगळवारी (24 नोव्हेंबर) या स्पर्धेतील पहिला सामना मोहन बगान क्लब आणि कोलकत्ता कस्टम क्लब यांच्यात झाला.
ईडन गार्डन स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात मोहन बगान संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
बगान क्लबचा सलामीवीर सौरभ सिंग अवघ्या 7 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर विवेक सिंगने डाव सांभाळन्याचा प्रयत्न केला मात्र त्यालाही मोठा डाव खेळता आला नाही. त्याने 29 चेंडूत 35 धावांची खेळी केली.
चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला अनुभवी फलंदाज मनोज तिवारीने डाव सांभाळला. त्याने 39 चेंडूत 61 धावांची मोठी खेळी केली. त्याने या खेळीत 5 चौकार आणि 3 षटकार ठोकले. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळेच या संघाला 20 षटकांत 156 धावा करता आल्या.
प्रत्युत्तरादाखल कोलकत्ता कस्टम क्लब संघाला 20 षटकांत अवघ्या 139 धावा करता आल्या. त्यामुळे या संघाचा 17 धावानी पराभव झाला.
उत्कृष्ट कामगिरीमुळे मनोज तिवारीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. पुरस्कार मिळाल्यानंतर मनोज तिवारी म्हणाला की, “मैदानावर परत आल्यामुळे खूप छान वाटले. क्रिकेट पुन्हा सुरू झाले आहे, यापेक्षा चांगली गोष्ट असूच शकत नाही”
बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अभिषेक दालमिया या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल म्हणाले की, “सर्व नियमांचे पालन करून ही टी20 स्पर्धा आयोजित केली गेली आहे. खेळाडू आणि इतर सहकारी जैव सुरक्षित वातावरणात वास्तव्य करत आहेत.”
महत्त्वाच्या बातम्या –
धोनीला दशकातील सर्वोत्तम वनडे खेळाडूसाठी आयसीसीकडून नामांकन; काय आहे त्याची कामगिरी, वाचा
स्टिव्ह स्मिथला असा चेंडू टाकून करा बाद, सचिन तेंडुलकरने सांगितली आयडीया
‘हे’ खेळाडू करू शकतात विराट आणि रोहितच्या अनुपस्थितीची भरपाई, स्टीव्ह स्मिथची भविष्यवाणी
ट्रेंडिंग लेख –
जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव वॉलाही ‘त्यादिवशी’ दादाने टॉससाठी पहायला लावली होती वाट
१९ वर्षीय पार्थिव पटेल थेट ऑस्ट्रेलियात स्टीव्ह वॉला नडला पण…