भारतीय क्रिकेट संघ सध्या आशिया चषक 2022 खेळण्यात व्यस्त आहे. संयुक्त अरब अमिरातीत होत असलेल्या या स्पर्धेतील पहिला साखळी फेरींचा टप्पा पार पडला असून सुपर-4 चे सामने सुरू आहेत. मंगळवारी (06 सप्टेंबर) दुबईच्या मैदानावर भारत आणि श्रीलंका संघ आमने सामने येणार आहेत. भारतासाठी हा सामना करा अथवा मरा सामना असणार आहे. या सामन्यापूर्वी माजी भारतीय क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग याने मोठी भविष्यवाणी केली आहे.
सेहवागने (Virender Sehwag) आशिया चषक विजेत्या (Asia Cup 2022 Winner) संघाचे नाव सांगितले आहे. जर भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धचा सामना हरला, तर रोहित शर्माचा संघ स्पर्धेबाहेर होईल. अशात भारतानंतर कोण विजेतेपदाचा दावेदार असेल?, याबद्दल सेहवाग बोलला आहे.
भारतीय संघाने साखळी फेरीतील त्यांचे दोन्हीही सामने जिंकत सुपर-4 मध्ये प्रवेश केला आहे. परंतु सुपर-4 मध्ये भारतीय संघाने पराभवासह सुरुवात केली आहे. सुपर-4 मधील आपल्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने भारताला 5 विकेट्सने पराभवाची धूळ चारली आहे. यानंतर आता भारताची अंतिम सामन्यात पोहोचण्याची समीकरणे कठीण बनली आहेत. भारताला आता स्पर्धेतील त्यांचे आव्हान टिकवून ठेवण्यासाठी उर्वरित दोन्हीही सामने जिंकावे लागणार आहे. जर भारताने या दोन्हीपैकी एकही सामना गमावला, तर त्यांचा स्पर्धेतील प्रवास तिथेच संपेल.
तत्पूर्वी सेहवाग क्रिकबझवर बोलताना म्हणाला की, “जर संयोगाने भारतीय संघाने आणखी एक सामना गमावला, तर ते स्पर्धेतून बाहेर होतील. दुसरीकडे पाकिस्तानला मात्र फायदा होणार आहे. कारण पाकिस्तानने जर एक सामना गमावला आणि दुसरा सामना गमावला, तरीही नेट रन रेटच्या बळावर ते अंतिम सामन्यात पोहोचतील. भारताने अगोदरच त्यांचा एक सामना गमावला असल्याचे दुसरा पराभव त्यांना स्पर्धेबाहेर करेल. म्हणूनच सध्या भारतावर दबाव आहे.”
“पाकिस्तानचा संघ दीर्घ काळानंतर आशिया चषकाचा अंतिम सामना खेळेल. त्यांनी आशिया चषकातही दीर्घ काळानंतर भारताला पराभूत केले आहे. त्यामुळे यंदाचे वर्ष पाकिस्तानचे असू शकते“, असेही सेहवागने (Virender Sehwag Prediction) म्हटले. पाकिस्तानने आशिया चषकातील शेवटचा अंतिम सामना 2014 मध्ये खेळला होता. या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानला 5 विकेट्सने पराभूत केले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेने जाहीर केलाय टी-20 विश्वचषकाचा संघ, महत्वाच्या खेळाडूची कमी जाणवणार
‘भारत श्रीलंकेविरुद्ध हरणार आणि आशिया चषकातून बाहेर होणार’, पाकिस्तानी क्रिकेटरचे कटू बोल
निवृत्तीची फक्त औपचारिकता, ‘मि. आयपीएल’ रैनाची आयपीएल कारकीर्द तर तेव्हाच संपली होती!