यावर्षी ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघ उपांत्य फेरीतून बाहेर पडला. उपांत्य सामन्यात भारताला इंग्लंडकडून 10 विकेट्सच्या मोठ्या अंतराने पराभव स्वीकारावा लागला. पराभवानंतर भारतीय संघ आणि खेळाडू टीकाकारांच्या चांगलेच निशाण्यावर आले आहेत. माजी दिग्गज सलामीवीर विरेंद्र सेहवाग देखील संघाच्या खराब प्रदर्शनामुळे नाराज दिसत आहे. सेहवागच्या मते पुढच्या टी-20 विश्वचषकात काही चेहरे असे असतील, ज्यांना तो पाहू इच्छित नाही आणि युवा खेळाडूंना संधी दिली पाहिजे, असेही त्याला वाटते.
टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) मध्ये भारत चांगले प्रदर्शन करत होता. ग्रुप स्टेजमध्ये खेळलेल्या सहा सामन्यांपैकी पाच सामने संघाने जिंकले. पण उपांत्य सामन्यात मात्र त्यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला. टी-20 विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आल्यानंतर चाहेत संघावर नाराजी व्यक्त करत आहेत. खासकरून कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) अनेकांच्या निशाण्यावर आल्याचे दिसते. रोहितचे वैयक्तिक प्रदर्शन देखील विश्वचषक स्पर्धेत निराशाजनक राहिले आहे. अशात विरेंद्र सहेवाग (Virender Sehwag) यांनी देखील नाव न घेता रोहितवर निशाणा साधल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सेहवागने कुणाचेही नाव न घेता काही चेहरे पुठच्या विश्वचषकात मी पाहु इच्छित नसल्याचे सांगितले आहे.
उपांत्य सामन्यात रोहित शर्मा 27 धावा करण्यासाठी 28 चेंडू खेळला. तर त्याच्या साधीने डावाची सुरुवात करण्यासाठी आलेला केएल राहुल () अवघ्या 5 धावा करून बाद झाला. संपूर्ण विश्वचषकात देखील या दोघांचे प्रदर्शन खूपच साधारण होते, ज्यामुळे मध्यक्रमातील फलंदाजांवर दबाव वाढल्याचे दिसते. सेहवागच्या मते टी-20 विश्वचषकाच्या पुढच्या हंगामात फक्त युवा खेळाडूंना संधी दिली गेली पाहिजे. यापूर्वी 2007 मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघाने असा प्रयोग केला होता आणि धोनीच्या नेतृत्वातील युवा संघाने विश्वचषक जिंकून सर्वांना आश्चर्यचकित केले होते.
माध्यमांशी बोलताना सेहवाग म्हणाला, “मी विचारसरणीविषयी बोलणार नाही. मी काही चेहऱ्यांना नक्कीच पुढच्या विश्वचषकात पाहु इच्छित नाही. याआधी 2007 टी-20 विश्वचषकातही असे झाले होते. जे दिग्गज खेळाडू होते, त्यांना विश्वचषक खेळायला पाठवले गेले नव्हते. अनेक युवा खेळाडू गेले होते आणि त्यांच्याकडून कुणाला काही अपेक्षा नव्हत्या. मला वाटते की, पुढच्या टी-20 विश्वचषकासाठीही असाच संघ पाहिजे. कुणालाच त्यांच्यकडून अपेक्षा नसतील, पण तो भारताचा भुविष्यातील संघ असेल.” दरम्यान, यावर्षीच्या टी-20 विश्वचषकात माजी कर्णधार विराट कोहलीने सर्वांचे लक्ष वेधले. विराटने या स्पर्धेत जबरदस्त प्रदर्शन करत भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नेपाळही भूषवणार अंडर 19 विश्वचषकाचे यजमानपद! या देशात ‘यंग इंडिया’ राखणार आपले विश्वविजेतेपद
T20WC: फायनलमध्ये टीम इंडिया नाही पण इंडियन तडका! एमसीजीमध्ये 13 वर्षीय भारतीय मुलीचा जलवा