कोणताही गोलंदाज नेहमीच कमीत कमीत धावा देऊन अधिकाधिक बळी टिपण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु, फलंदाज त्यांच्या या स्वप्नाला सुरुंग लावण्याचे काम करत असतात. मात्र, क्रिकेटच्या इतिहासात असे काही झाले आहेत, ज्यांनी फलंदाजांना त्यांच्या प्रयत्नाआड येऊच दिले नाही. त्यामुळे क्रिकेट इतिहासात या गोलंदाजांची कामगिरी सुवर्ण अक्षरात लिहिली गेली आहे.
“क्रिकेट हा तसा अनिश्चिततेचा खेळ आहे. येथे कोणत्या चेंडूवर काय घडले, याचा निश्चित अंदाज कोणीही लावू शकत नाही. त्यातही गोलंदाजांना तर आपला चेंडू निर्धाव असेल की, अधिक धावा देऊन जाईल, याबाबत नेहमीच चिंता असते.”
गोलंदाज आपला प्रत्येक चेंडू निर्धाव टाकण्याचा प्रयत्न करत असतात. त्यासाठी ते आपल्या गोलंदाजीत अनेक बदल करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, याच प्रयत्नापायी समोरच्या फलंदाजाला धावा करणे कधी कधी सोपे बनून जाते.
गोलंदाज आपल्या चेंडूंवर कमी धावा देण्यासोबतच अवांतर धावा न देण्याचाही प्रयत्न करत असतात. टाकलेला चेंडू नो बॉल, वाईड बॉल न जाऊ देण्याचा प्रयत्न गोलंदाजांचा असतो. परंतु, गोलंदाजीत परिवर्तन करणे, सामन्याचा दबाव, फलंदाजाचा दबाव अशा कारणांमुळे गोलंदाजांकडून अनेकदा नो बॉल अथवा वाईड बॉल टाकले जातात. मात्र, “जगात असे काही महान गोलंदाज आहेत, ज्यांनी आपल्या संपुर्ण क्रिकेट कारकिर्दीत एकही वाईड चेंडू टाकलेला नाही.”
या लेखात आपण जगातील असे 10 दिग्गज गोलंदाज पाहणार आहोत, ज्यांनी त्यांच्या एकूण क्रिकेट कारकिर्दीत एकही वाईड चेंडू टाकलेला नाही.
वाचा या 10 दिग्गज खेळाडूंची नावे आणि त्यांची कामगिरी…
क्रमांक – 10
- रिचर्ड हेडली (न्युझीलंड)
न्युझीलंड संघाचे माजी खेळाडू आणि जगातील एक दिग्गज गोलंदाज रिचर्ड हेडली, यांचेही नाव या यादीत आहे. हेडली यांना क्रिकेट जगात एक महान अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जाते.
हेडली यांनी त्यांच्या 17 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत एकही वाईड बॉल टाकलेला नाही. त्यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 86 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात त्यांनी 431 विकेट आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. तसेच 115 एकदिवसीय सामन्यांमध्ये हेडली यांनी तब्बल 158 बळी टिपले आहेत.
क्रमांक – 9
- लांस गिब्स (वेस्ट इंडीज)
लांस गिब्स यांना क्रिकेट जगतातील एक यशस्वी फिरकी गोलंदाज मानले जाते. गिब्स हे अशा मोजक्या गोलंदाजांपैकी आहेत, ज्यांची इकाॅनाॅमी ही 2 पेक्षाही कमी आहे.
“गिब्स हे कसोटी क्रिकेटमध्ये 300 विकेट घेणारे पहिले फिरकी गोलंदाज आहेत.” त्यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 3 एकदिवसीय सामने आणि 79 कसोटी सामने खेळले. वेस्ट इंडीजच्या या महान गोलंदाजाने देखील त्याच्या कारकिर्दीत एकही वाईड चेंडू टाकलेला नाही.
क्रमांक – 8
- क्लेरी ग्रिमेट (ऑस्ट्रेलिया)
ग्रिमेट हे ऑस्ट्रेलिया संघाचे एक महान फिरकी गोलंदाज होते. क्लेरी ग्रिमेट यांनाच ‘फ्लिपर’ चे जनक मानले जाते. खरे तर त्यांना जलदगती गोलंदाज व्हायचे होते, मात्र शालेय स्तरावर त्यांच्या प्रशिक्षकाने त्यांना फिरकी चा सल्ला दिला.
17 व्या वर्षीच क्रिकेट खेळायला सुरुवात केलेल्या या खेळाडूने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत 37 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात 216 बळी आपल्या खात्यात जमा केले आहेत. क्लेरी ग्रिमेट यांनी देखील त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत एकदाही वाईड चेंडू टाकलेला नाही.
क्रमांक – 7
- डेरेक अंडरवुड (इंग्लंड)
डेरेक अंडरवुड हे इंग्लंड संघाचे ‘लेफ्ट ऑर्म ऑर्थोडॉक्स’ फिरकी गोलंदाज होते. या गोलंदाजाची गोलंदाजी इतकी सफाईदार होती की, त्यानेही आपल्या संपुर्ण क्रिकेट कारकिर्दीत एकही वाईड चेंडू टाकलेला नाही.
1969 सालापासून 1973 सालापार्यंत डेरेक अंडरवुड हे गोलंदाजांच्या क्रमवारीत अग्रस्थानी होते. त्यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 86 कसोटी सामने आणि 26 वनडे सामने खेळले आहेत.
क्रमांक – 6
- गॅरी सोबर्स (वेस्टइंडीज)
सर गारफील्ड सोबर्स हे वेस्ट इंडीज संघाचे महान खेळाडू होते. त्यांना क्रिकेटच्या इतिहासातील दिग्गज अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जाते. सोबर्स यांनाच सर डॉन ब्रॅडमन यांनी ‘फाइव इन वन क्रिकेटपटू’ असे म्हटले होते.
सोबर्स हे फलंदाजी आणि गोलंदाजीसहीत एक उत्तम यष्टीरक्षक देखील होते. त्यांनी आपल्या संपुर्ण क्रिकेट कारकिर्दीत 93 कसोटी सामने आणि एकच वनडे सामना खेळला होता. सोबर्स यांनी गोलंदाज म्हणून तब्बल 20,660 चेंडू फेकले. ज्यात त्यांनी एकही वाईड चेंडू टाकलेला नाही.
क्रमांक – 5
- इम्रान खान (पाकिस्तान)
पाकिस्तान संघाच्या विश्वविजेत्या संघाचे तत्कालीन कर्णधार आणि सध्याचे पंतप्रधान असलेले इम्रान खान, यांचे नाव देखील या यादीत समाविष्ट आहे.
पाकिस्तानच्या या महान गोलंदाजाने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 88 कसोटी सामने आणि 175 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यात त्यांनी कसोटीत 362 आणि वनडे सामन्यात एकूण 182 बळी आपल्या खात्यात जमा केले आहे. इम्रान खान यांनी देखील आपल्या क्रिकेट कारकिर्दीत एकही वाईड बॉल टाकलेला नाही.
क्रमांक – 4
- इयान बॉथम (इंग्लंड)
इंग्लंड संघाचे पुर्व क्रिकेटपटू इयान बॉथम यांना क्रिकेटच्या इतिहास एक महान अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जाते.
“बॉथम हे पहिले क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी एका कसोटी सामन्यात 10 बळी घेण्याची आणि शतक झळकावण्याची कामगिरी केलेली आहे.”
इयान बॉथम यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 102 कसोटी सामने आणि 116 वनडे सामने खेळे आहेत. ज्यात त्यांनी प्रत्येकी 383 आणि 145 विकेट आपल्या खात्यात जमा केले आहेत. परंतु विशेष बाब म्हणजे एवढ्या मोठ्या क्रिकेट कारकिर्दीत या खेळाडूने एकही वाईड चेंडू टाकलेला नाही.
क्रमांक – 3
- डेनिस लिली (ऑस्ट्रेलिया)
ऑस्ट्रेलिया संघाचे दिग्गज गोलंदाज आणि जगातील एक महान खेळाडू डेनिस लिली यांनी देखील त्यांच्या संपुर्ण क्रिकेट कारकिर्दीत एकाही वाईड बॉल टाकलेला नाही.
डेनिस लिली हे एक जबरदस्त जलदगती गोलंदाज होते. “1984 साली जेव्हा ते क्रिकेटमधून निवृत्त झाले होते, तेव्हा त्यांच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम होता.” लिली यांनी आपल्या 13 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत 70 कसोटी आणि 63 वनडे सामने खेळले आहेत. ज्यात त्यांनी प्रत्येकी 355 आणि 103 बळी आपल्या खात्यात जमा केले आहेत.
क्रमांक – 2
- बॉब विलिस (इंग्लंड)
बॉब विलिस यांनी 1971 पासून ते 1984 पर्यंत इंग्लंड संघाच्या गोलंदाजीची धुरा संभाळली होती. विलिस यांनीच 1981 च्या अशेस मालिकेत अवघ्या 43 धावांत 8 विकेट घेत, हातातून गेलेला सामना इंग्लंडच्या पारड्यात आणून टाकला होता.
विलिस यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत तबब्ल 90 कसोटी सामने खेळले. ज्यात त्यांनी 325 बळी टिपले आहेत. इंग्लंडच्या या दिग्गज गोलंदाजाने आपल्या संपुर्ण क्रिकेट कारकिर्दीत एकही वाईड बॉल न टाकण्याचा पराक्रम केलेला आहे.
क्रमांक – 1
- फ्रेड ट्रूमैन (इंग्लंड)
फ्रेड ट्रूमैन यांनी 1948 पासून साधारण दोन दशके इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व केले होते. क्रिकेटच्या इतिहासात एक महान गोलंदाज म्हणून फ्रेड ट्रूमैन यांची गणना केली जाते.
फ्रेड ट्रूमैन यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत एकूण 67 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात त्यांनी 307 बळी आपल्या खात्यात जमा केले आहेत. फ्रेड ट्रूमैन यांची देखील त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत एकही वाईड चेंडू टाकलेला नाही.
टीप – “सन 1980 च्या अगोदरचे आकडे हे तितके खात्रीलायक मानता येत नाही. याचे कारण तेव्हा नो बॉल आणि वाइड बॉल यांची नोंद करण्यासाठी आजच्यासारखी योग्य व्यवस्था नव्हती.”