जगातील सर्वात मोठी लीग म्हणजेच इंडियन प्रिमीयर लीगवर (आयपीएल) कोरोना व्हायरसचे सावट पसरले आहे. परिणामत: आयपीएल २०२० अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे.
२००८पासून सुरुवात झालेल्या आयपीएलचे आतापर्यंत १२ हंगाम पूर्ण झाले आहेत. यात मुंबई इंडियन्सने सर्वाधिक ४ वेळा आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. तर, चेन्नई सुपर किंग्सने ३ वेळा हा कारनामा केला आहे. शिवाय, या यादीत कोलकाता नाईट रायडर्सचाही समावेश आहे. त्यांनी २ वेळा आयपीलमध्ये विजय मिळवला आहे.
आयपीएलच्या या १२ वर्षांच्या प्रवासात आपल्याला अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले. काही सामन्यांचा निकाल तर अगदी शेवटच्या चेंडूवर ठरला. या लेखात आपण जाणून घेणार आहोत आयपीएलमधील १२ हंगामात शेवटचा चेंडू टाकणाऱ्या खेळाडूंबद्दल.
आयपीएलच्या प्रत्येक हंगामात शेवटचा चेंडू टाकणारे खेळाडू-
१२. आयपीएल २०१९- लसिथ मलिंगा (मुंबई इंडियन्स)
आयपीएलच्या १२व्या हंगामातील शेवटचा चेंडू मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने (Lasith Malinga) टाकला होता. त्याने चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या (Chennai Super Kings) अंतिम सामन्यातील शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शार्दुल ठाकूरला बाद केले होते. यासह मुंबईने चौथ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली होती.
११. आयपीएल २०१८- कार्लोस ब्रॅथवेट (सनराइजर्स हैद्राबाद)
आयपीएल २०१८मध्ये शेवटचा चेंडू सनराइजर्स हैद्राबादचा (Sunrisers Hyderabad) अष्टपैलू क्रिकेटपटू कार्लोस ब्रॅथवेटने (Carlos Brathwaite) टाकला होता. हैद्राबादने सुरुवातीला फलंदाजी करत २० षटकात १७८ धावा करत चेन्नई सुपर किंग्सला १७९ धावांचे आव्हान दिले होते.
मात्र, सीएसकेच्या शेन वॉटसनने नाबाद ११७ धावा करत संघाच्या विजयाला हातभार लावला होता. शेवटच्या षटकात सीएसकेला २ धावांची आवश्यकता असताना ब्रॅथवेटने २०व्या षटकाचा शेवटचा चेंडू टाकला होता.
१०. आयपीएल २०१७- मिचेल जॉन्सन (मुंबई इंडियन्स)
आयपीएलच्या १०व्या हंगामात मुंबई इंडियन्सने विजयी ठरला होता. या हंगामातील शेवटचा चेंडू मिचेल जॉनसनने (Mitchell Johnson) टाकला होता. सुरुवातीला फलंदाजी करणाऱ्या मुंबईने रायझिंग पुणे सुपरजायंट्सला (Rising Pune Supergiants) १२९ धावांचे आव्हान दिले होते. यावेळी आरपीएसला विजयासाठी शेवटच्या षटकात ११ धावांची गरज होती.
अशात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने जॉन्सनकडे शेवटचे षटक टाकण्याची जबाबादारी सोपविली होती. जॉन्सनच्या पहिल्या चेंडूवर फलंदाजी करणाऱ्या मनोज तिवारीने चौकार ठोकला होता आणि दुसऱ्याच चेंडूवर तो बाद झाला होता. यानंतर स्टिव स्मिथला बाद करत जॉन्सनने संघाला १ धावेने विजय मिळवून दिला होता.
९. आयपीएल २०१६- भुवनेश्वर कुमार (सनरायजर्स हैद्राबाद)
आयपीएल २०१६मध्ये सनरायजर्स हैद्राबादने ७ बाद २०८ धावा केल्या होत्या. त्यांच्या २०९ धावांचे आव्हान रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर मात्र पूर्ण करू शकले नाही. आरसीबीला अंतिम सामन्याच्या शेवटच्या षटकात विजयासाठी १८ धावांची आवश्यकता होती. यावेळी हैद्राबादच्या भुवनेश्वर कुमारने ८ धावांनी आपल्या संघाला पहिल्यांदाच आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले होते.
८. आयपीएल २०१५- विनय कुमार (मुंबई इंडियन्स)
आयपीएलच्या २०१५च्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करत २०२ धावा केल्या होत्या. यावेळी चेन्नई सुपर किंग्सने २०३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत, २० षटकात ८ बाद १६१ धावा केल्या होत्या. शेवटच्या षटकात त्यांना ६३ धावांची गरज होती. यावेळी विनय कुमार (Vinay Kumar) गोलंदाजी करत आयपीएलच्या ८व्या हंगामात शेवटचा चेंडू टाकणारा गोलंदाज ठरला.
७. आयपीएल २०१४- परविंदर अवाना (किंग्स इलेव्हन पंजाब)
आयपीएलच्या ७ व्या हंगामातील अंतिम सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्स इलेव्हन पंजाबमध्ये झाला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करत पंजाबने १९९ धावा केल्या होत्या. केकेआरने पंजाबच्या २०० धावांचे आव्हान पूर्ण करण्यात केले होते. त्यावेळी पंजाबच्या परविंदर अवानाच्या (Parvinder Awana) शेवटच्या षटकात पीयूष चावलाने चौकार ठोकत केकेआरला विजयी बनवले होते.
६. आयपीएल २०१३- कायरन पोलार्ड (मुंबई इंडियन्स)
आयपीएल २०१३चा अंतिम सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सिपर किंग्समध्ये झाला होता. यावेळी रोहित शर्मा (Rohit Sharma) प्रथमच मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनला होता. त्याच्या संघाने ९ बाद १४८ धावा केल्या होत्या. तेव्हा सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) जबरदस्त खेळी करूनही सामना गमावला होता.
शेटच्या षटकात सीएसकेला विजयासाठी ३९ धावांची आवश्यकता होती. मुंबईच्या कायरन पोलार्डच्या (Kieron Pollard) गोलंदाजीचा सामना करत धोनीने पहिल्या २ चेंडूला सिमारेषेबाहेर पाठवले खरे, पण उर्वरित चेंडूत त्याला एकही धाव घेता आली नाही. अशाप्रकारे हा सामना मुंबईने २३ धावांनी जिंकला.
५. आयपीएल २०१२- ड्वेन ब्रावो (चेन्नई सुपर किंग्स)
आयपीएल २०१२मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने पहिल्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकाविले होते. ड्वेन ब्रावोने या मोसमातील शेवटचा चेंडू टाकला होता. अंतिम सामन्यात केकेआरने चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केले होते. सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद १९० धावा केल्या होत्या.
सीएसकेच्या १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरला शेवटच्या षटकात विजयासाठी केवळ ९ धावांची आवश्यकता होती. तसेच ड्वेन ब्रावो गोलंदाजी करत होता. यावेळी मनोज तिवारीने (Manoj Tiwari) तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर चौकार ठोकत आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता.
४. आयपीएल २०११- सुरेश रैना (चेन्नई सुपर किंग्स)
आयपीएलच्या चौथ्या मोसमात चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला अंतिम सामन्यात पराभूत करत आयपीएलचे दुसऱ्यांदा विजेतेपदक पटकाविले होते. या अंतिम सामन्यातील शेवटचा चेंडू मिस्टर आयपीएल सुरेश रैनाने टाकला होता.
आरसीबीला शेवटच्या षटकात विजयासाठी ७३ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी धोनीने रैनाला गोलंदाजी करण्यासाठी पाठविले होते. रैनाने त्या षटकातील दुसऱ्या आणि सहाव्या चेंडुवर षटकार बसला खरा, परंतु सीएसकेने हा सामना ५८ धावांनी जिंकला होता.
३. आयपीएल २०१०- डग बोलिंगर (चेन्नई सुपर किंग्स)
आयपीएल २०१०च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सला पराभूत करत आयपीएलचे पहिले विजेतेपद पटकाविले होते. त्या अंतिम सामन्यातील शेवटचे षटक सीएसकेचा गोलंदाज डग बोलिंगर टाकत होता.
चेन्नईने मुंबईला १६९ धावांचे आव्हान दिले होते. यावेळी सामन्यातील शेवटच्या षटकात मुंबईला २७ धावांची आवश्यकता होती. डगने यावेळी केवळ ४ धावा दिल्या होत्या आणि सामना आपल्या खिशात घातला होता. अशाप्रकारे डग आयपीएलच्या तिसऱ्या मोसमात शेवटच्या षटकातील चेंडू टाकणारा गोलंदाज ठरला होता.
२. आयपीएल २००९- आर.पी. सिंग (डेक्कन चार्जर्स)
आयपीएलच्या दुसऱ्या मोसमात अंतिम सामन्यातील शेवटचा चेंडू आर.पी. सिंगने टाकला होता. यावेळी डेक्कन चार्जर्सने आरसीबीला १४४ धावांचे आव्हान दिले होते. चार्जर्सच्या या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीने १९व्या षटकापर्यंत १२९ धावा केल्या होत्या. त्यामुळे त्यांना शेवटच्या षटकात १५ धावांची आवश्यकता होती.
त्यावेळी आरसीबीला केवळ ८ धावाच करता आल्या होत्या. अशाप्रकारे डेक्कन चार्जर्सने आयपीएलच्या दुसऱ्या मोसमावर आपले नाव कोरले होते.
१. आयपीएल २००८- लक्ष्मीपति बालाजी (चेन्नई सुपर किंग्स)
आयपीएलच्या पहिल्या आणि महत्त्वाच्या मोसमातील शेवटचा चेंडू चेन्नई सुपर किंग्सच्या लक्ष्मीपती बालाजीने टाकला होता. सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १६३ धावा केल्या होत्या.
सीएसकेच्या १६३ धावांचे आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सने चमकदार कामगिरी केली. राजस्थानला शेवटच्या षटकात विजयासाठी केवळ ८ धावांची आवश्यकता होती.
त्यावेळी धोनीने गोलंदाजीची धुरा बालाजीकडे सोपविली होती. राजस्थानकडून फलंदाजी करण्यासाठी शेन वॉर्न आणि सोहेल तनवीर मैदानावर उपस्थित होते. त्यांनी पहिल्या ५ चेंडूत ७ धावा केल्या. त्यानंतर राजस्थानला विजयासाठी शेवटच्या चेंडूत केवळ १ धावेची आवश्यकता होती. त्यावेळी तनवीरने मिड ऑनच्या दिशेला फटकार मारत १ धाव घेतली आणि आयपीएलच्या पहिल्या मोसमाचे विजेतेपद राजस्थान संघाला मिळवून दिले.
आयपीएल स्पर्धेवरील काही खास लेख-
-चेन्नई सुपर किंग्स-मुंबई इंडियन्स आणि अंतिम सामना, हे नाते काही खासच
-आयपीएल इतिहासातील सर्वोत्कृष्ट कर्णधाराचा मान या क्रिकेटपटूच्या नावावर
-आयपीएलचा एकही सामना न खेळता ट्वेंटी-ट्वेंटीमध्ये ५ हजार धावा करणारे ५ खेळाडू
-ऑक्टोबरमध्ये टी२० विश्वचषकाऐवजी होणार आयपीएल?
-आयपीएलच्या ऑल टाईम फ्लाॅप ११ खेळाडूंची टीम, हे आहेत ४ विदेशी खेळाडू
-आयपीएल इतिहासात अनसोल्ड राहिलेले ३ महान भारतीय क्रिकेटपटू
-गंभीर म्हणतो, फक्त हा खेळाडू संघात हवा होता, केकेआरने जिंकली असती अनेक विजेतेपदं
-आयपीएल झाली नाही, पण हा खेळाडू ठरला आयपीएलमधील बेस्ट कॅप्टन
-धोनी नसेल तर चेन्नई सुपर किंग्जचं काही खरं नाही
-हा खेळाडू म्हणतो, धोनीसारखा कॅप्टन होणे नाही
-करोना विरुद्धच्या लढाईत अजय ठाकूर असे करतोय नेतृत्व
-विशेष लेख: खरंच गेल्या १२ वर्षात आयपीएलमुळे एकंदरीतच आयुष्य, क्रिकेट खूप(च) बदलून गेलं नै
-जगातील टाॅप ५ श्रीमंत क्रिकेट लीग, जिथे क्रिकेटर्स होतात करोडपती
-आयपीएलच्या संघमालकांची यादी; चेन्नईच्या मालकाचे नाव ऐकून थक्क व्हाल
-आयपीएल इतिहासातील हे आहेत ५ मोठे वाद, ज्यामुळे आयपीएलच नाव झालं खराब
-आयपीएलच्या ट्राॅफीवर संस्कृत भाषेत नक्की काय लिहीले आहे?
-या दोन संघांनी आयपीएलमध्ये बदलले आहेत तब्बल ११ कर्णधार
-आयपीएलचे तब्बल ११ हंगाम एकाच संघाकडून खेळलेला तो एकमेव खेळाडू