आयपीएलचा १३ वा हंगाम मार्चमध्ये सुरु होणार होता. पण कोरोना व्हायरसमुळे हा हंगाम पुढे ढकलण्यात आला होता. आता अखेर हा हंगात १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरदरम्यान होणार असल्याचे निश्चित झाले आहे. तसेच हा हंगाम भारतातील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता युएईमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या सर्व संघ युएईमध्ये पोहचले आहेत.
नेहमीप्रमाणे यावेळीही मुंबई इंडियन्स हा विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. आत्तापर्यंत मुंबई इंडियन्सने ४ वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले असून तो आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे. तसेच मुंबईकडे रोहित शर्मासारखा अनुभवी कर्णधारही असून संघातही अनेक अनुभवी खेळाडू आहेत. त्यामुळे हा संघ सहाजिकच विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानला जातो. पण या लेखात अशा ३ कारणांचा आढावा घेतला आहे, ज्यामुळे यंदा मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलचे विजेतेपद मिळवण्याच्या शर्यतीत मागे पडू शकतो.
३ कारणे, ज्यामुळे यंदा मुंबई इंडियन्स जिंकू शकत नाही आयपीएल विजेतेपद –
१. युएईमधील मुंबई इंडियन्सची आकडेवारी आहे सर्वात खराब –
थोडा इतिहासाचा आढावा घेतला तर लक्षात येते मुंबई इंडियन्सची आकडेवारी युएईमधील काही खास नाही. याआधी २०१४ ला आयपीएलमधील सुरुवातीचे काही सामने लोकसभा निवडणूकांमुळे युएईमध्ये आयोजिक करण्यात आले होते. त्यावेळी मुंबई इंडियन्सने ५ सामने युएईमध्ये खेळले होते. या सर्व ५ सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे मुंबई इंडियन्स हा एकमेव आयपीएलमधील संघ आहे, ज्यांना युएईमध्ये एकही सामना जिंकता आलेला नाही. हा इतिहास पाहिला तर कदाचित यावेळीही मुंबई इंडियन्सला युएईमध्ये संघर्ष करावा लागू शकतो.
२. फिरकी गोलंदाजांची कमतरता –
मुंबई इंडियन्स संघ चांगल्या गोलंदाजी फळीसाठी ओळखला जातो. यंदा देखील मुंबई इंडियन्सकडे तगडे वेगवान गोलंदाज आहेत, यात लसिथ मलिंगा, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ड अशा वेगवान गोलंदांचा समावेश आहे. पण फिरकी गोलंदाजी पाहिली तर कमजोर दिसते. कारण मुंबईकडे राहुल चाहर सोडला तर पूर्णवेळ फिरकी गोलंदाजी करणारा आणि आयपीएलचा अनुभव असलेला फिरकी गोलंदाज संघात नाही. कृणाल पंड्या चाहरला साथ द्यायला आहे परंतु तो एक अष्टपैलू क्रिकेटपटू आहे. तसेच मुंबई इंडियन्सने या आयपीएलच्या आधी फिरकीपटू मयंक मार्कंडेला मुक्त केले होते. त्याचबरोबर युएईमध्ये फिरकी गोलंदाजांचे अनेकदा वर्चस्व राहते. त्यामुळे आता मुंबईला फिरकी गोलंदाजांची कमतरता भासू शकते.
३. फॉर्म आणि फिटनेस –
यावेळी आयपीएलमधून रोहित शर्मा, हार्दिक पंड्या हे खेळाडू दुखापतीनंतर मैदानात पुनरागमन करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या फॉर्मकडे सर्वांचेच लक्ष असेल. तसेच बुमराहसुद्धा नुकताच दुखापतीतून सावरला आहे. तसेच त्याने जेव्हा यावर्षाच्या सुरुवातीला भारतीय संघात दुखापतीनंतर पुनरागमन केले होते, तेव्हा त्याची कामगिरी फारशी बरी झाली नव्हती. तसेच लसिथ मलिंगा देखील तंदुरुस्तीच्या समस्येशी झगडत आहे. त्याचा गोलंदाजी करतानाचा वेगही कमी झाला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्ससाठी यंदा खेळाडूंची तंदुरुस्ती आणि फॉर्म डोकेदुखी ठरु शकते. या समस्यांमुळे त्यांना यंदा मोठा फटकाही बसू शकतो.
ट्रेंडिंग लेख –
खुद्द क्रिकेटलाही ‘तो’ क्रिकेट खेळतोय याचा अभिमान वाटणारा जीमी…
कसोटी क्रिकेटची खरी चव २१व्या शतकात चाहत्यांना चाखायला देणारा अवलिया गोलंदाज
आयपीएल २०२०मध्ये हे महान क्रिकेटर करु शकतात क्रिकेटला अलविदा
महत्त्वाच्या बातम्या –
‘कॅप्टनकूल’ची बाजू घेणे पाकिस्तानी दिग्गजाला पडले महागात, पीसीबीने लावली ‘या’ गोष्टीवर बंदी
नुकतेच २६७ धावांची खेळी करणाऱ्या फलंदाजाच्या वडिलांविषयी पसरली अफवा, खरं काय ते घ्या जाणून