भारताचे माजी क्रिकेटपटू भागवत चंद्रशेखर यांना मॅच विनर (सामना जिंकणारा) म्हटले जाते. हे ते क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी भारतीय संघाला सीमारेषेच्या पलीकडे पहिल्यांदा विजय मिळवून दिला होता. सीमारेषेच्या पलीकडे म्हणजे इथे तिथे कुठे नाही, तर क्रिकेटची पंढरी म्हटले जाणाऱ्या इंग्लंडमध्ये त्यांनी भारताला पहिल्यांदा कसोटी मालिका विजय मिळवून दिले होते.
विशेष म्हणजे, हा क्रिकेटपटू लहानपणी पोलिओने पिडीत होता. पण, त्याच्या आत्मविश्वासात या आजारामुळे क्वचितही फरक पडला नव्हता. एकेकाळी भारताची स्पिन चौकडी म्हणून ओळखले जाणाऱ्या बिशन सिंग बेदी, इरापल्ली प्रसन्ना आणि वेंकटराघवन यांच्या चौकडीचे चंद्रशेखर हे चौथे आणि महत्त्वाचे सदस्य होते. या चौकडीने मिळून जगभरातील फलंदाजांच्या तोंडचे पाणी पळवले होते. भारतीय संघाला त्यांच्यामुळे एक नवी ओळख मिळाली होती.
अशा या दमदार फिरकी गोलंदाजाचा काल (१७ मे) ७६वा वाढदिवस होता. Bhagwat Chandrashekhar 76th Birthday Special.
कर्नाटकमधील म्हैसुर येथे जन्मलेले चंद्रशेखर हे १९७१साली भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर गेेले होते. यावेळी दोन्ही संघात ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली होती. या मालिकेतील पहिला आणि दुसरा सामना अनिर्णित राहिला होता. त्यामुळे भारताला तिसरा आणि शेवटचा सामना जिंकण्याची आवश्यकता होती.
इंग्लंडच्या ओव्हल स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत भारताला ३५६ धावांचे लक्ष दिले होते. यात चंद्रशेखर यांच्या २ विकेट्सचा समावेश होता. इंग्लंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ पहिल्या डावात फक्त २८४ धावा करु शकला होता. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीस उतरलेल्या इंग्लंडला भारतीय गोलंदाजांनी १०१ धावांवर सर्वबाद केले होते. यावेळी दमदार प्रदर्शन करत चेंद्रशेखर यांनी ३८ धावा देत ६ विकेट्स घेतल्या होत्या. अखेर भारताने ती मालिका ४ विकेट्सने खिशात घातली होती.
चंद्रशेखर यांनी त्यांच्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत ५८ कसोटी सामन्यात ९७ डाव खेळत २९.७४च्या सरासरीने २४२ विकेट्स घेतल्या होत्या. यात त्यांनी १६वेळा कसोटीच्या एका डावात ५ विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. तर, २वेळा एका सामन्यात १० विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता.
चंद्रशेखर यांनी त्यांच्या अफलातून गोलंदाजी शैलीने भारताची परदेशातील प्रतिभा उंचावली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियासाठी अक्षरश: जीवाचं रान केलेल्या ‘या’ ३ खेळाडूंना कधीही मिळाली नाही कर्णधारपदाची संधी
‘या’ गोष्टीमुळे कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात रोहित येणार अडचणीत, माजी पाकिस्तानी कर्णधाराचा दावा