भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज अजिंक्य रहाणेला गेल्या काही दिवसांपासून मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी भारतीय संघात संधी मिळालेली नाही.
कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने भारतात आणि परदेशातही चांगली कामगिरी करणाऱ्या अजिंक्य रहाणेला आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघातूनही वगळ्यात आले आहे.
भारताचे माजी क्रिकेटपटू मुंबईकर दिलीप वेंगसरकर यांनी निवड समितीच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
“भारतीय संघाने 1986 नंतर प्रथमच 2014 साली लॉर्ड्सवर अजिंक्य रहाणेच्या शतकाच्या जोरावर कसोटी सामना जिंकला. एकदिवसीय सामन्यात अजिंक्यसारखा खेळाडू फलंदाजीची एक बाजू लावून धरत भारतीय फलंदाजीला स्थिरता देण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावू शकला असता. मात्र अजिंक्यला एकदिवसीय संघातून वगळल्याने मला आश्चर्य वाटतेय.” असे भारताचे माजी फलंदाज दिलीप वेंगसरकर म्हणाले.
याचबरोबर वेंगसरकर यांनी यो-यो टेस्टसंबंधीही भाष्य केले. त्यांनी यो-यो टेस्टमध्ये फेल झालेल्या खेळाडूंचीही पाठराण केली.
“आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळण्यासाठी प्रत्येक क्रिकेटपटूने फिट राहिले पाहिजे. मात्र यो-यो टेस्टमध्ये फेल झालेल्या संजू सॅमसन, अंबाती रायुडू आणि मोहम्मद शमीला यो-यो टेस्ट पास करण्याची एक संधी द्यावी.” असे वेंगसरकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
भारताकडून इंग्लंमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दिलीप वेंगसरकर यांचा चौथा क्रमांक लागतो.
त्यांनी इंग्लंडमध्ये खेळलेल्या 13 कसोटी सामन्यात 48 च्या सरासरीने 960 धावा केल्या आहेत. त्यामध्ये वेंगसरकरांनी 4 शतके केली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-वनडे मालिकेत सपाटून मार खालेल्ली टीम आॅस्ट्रेलिया प्रतिष्ठेसाठी आज मैदानात