१९७१ मधली ही घटना आहे. तेव्हा भारतीय कर्णधाराची कमान अजीत वाडेकर यांच्याकडे होती. अचानक ही वाडेकर यांना ही जबाबदारी दिली होती. वाडेकर आपल्या कर्णधार टाइगर पतौडी (Mansoor Ali Khan Pataudi) यांना संघनिवडीवेळी माझ्याकडे पण लक्ष असुद्या, असे सांगायचे आणि त्याच वाडेकरांना पुढे टायगरची जागा म्हणजे कर्णधारपद मिळालं.
भारतीय संघ अचानक पणे एका नवाबच्या हातातून मुंबईच्या एका सामान्य खेळाडूच्या हाती दिला, जो वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळविण्याचे स्वप्न घेऊन अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्याचा विचार करत होता. (engineering) . वाडेकरांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वेस्ट इंडीजमध्ये मालिका जिंकून इंग्लंडमध्ये दाखल झाला होता. इंग्लंडमध्ये द ओव्हल कसोटीमध्ये भारताने कसोटी सामना जिंकला. हा सामना भारतीय संघ जिंकेल याची कुणी कल्पनाही केली नव्हती. त्या सामन्यात चंद्रशेखरने ८ गडी बाद केले होते.
चंद्रशेखरने दुसऱ्या डावात ३८ धाव देऊन ६ गडी बाद करत इंग्लंडला १०१ धावांवर रोखलं होतं. त्यानंतर जेव्हा १७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा आबिद अली विजयी धाव घेत असताना आणि भारत इतिहास घडवत असताना संघाचा कर्णधार मात्र आरामखुर्चीत आरामात झोपला होता. हा संघ विजयी होईल याची जाणीव अजित वाडेकर यांना होती आणि ते ड्रेसिंग रूममध्ये आरामात झोपले होते. जेव्हा संघ विजयी झाला आणि संपूर्ण संघ विजय साजरा करत होता होता तेव्हा विजयाच्या अनंदोत्सावाच्या आवाजानेही वाडेकरांना जाग आली नव्हती. अखेर विजयाच्या शुभेच्छा देण्यासाठी इंग्लंड संघाचे मॅनेजर केन बॅरिंग्टन (Kane Barrington) ड्रेसिंग रूममध्ये आले तेव्हा अजित वाडेकर यांना झोपेतून उठवण्यात आलं.
सामना संपल्या नंतर एका बाजूला औपचारिकता चालू झाली आणि दुसऱ्या बाजूला टीम इंडियाच्या विजयी आनंदोत्सवाची तयारी सुरु झाली. एका खोलीत जेवण लागलं आणि शॅम्पेनच्या बॉटल दिसू लागल्या. कर्णधार वाडेकर साहेबांना शॅम्पेनची आवड होती. त्यांनी निद्रिस्त डोळ्यांनी शॅम्पेनकडे बघितलं आणि प्रेस कॉन्फरन्ससाठी निघून गेले.
ते पटकन पत्रकार परिषद संपवून ड्रेसिंग रूममध्ये परतले. अजित वाडेकरांनी जेव्हा शॅम्पेनची बॉटल उचलण्यास सुरूवात केली, तेव्हा त्यांना समजले की ती संपली आहे. सर्व शॅम्पेन संपलं होतं. जेव्हा त्यांनी चौकशी केली तेव्हा असे असे समजले की फ़ारुख इंजीनियर (Farokh Maneksha Engineer) यांना नकार देऊनही त्यांनी शॅम्पेन ड्रिंक घेतली आणि संपवून टाकली. कर्णधार अजित वाडेकर यांच्यासाठी काहीही शिल्लक ठेवले नाही. यानंतर अजित वाडेकर यांना शॅम्पेन एन्जॉय करायची होती पण ती मिळू शकली नाही. त्यांना बीयरनेच एन्जॉय करावे लागले.
तो विजय भारतासाठी महत्त्वाचा होता कारण भारताने इंग्लंडमध्ये पहिल्यांदा इंग्लंडला पराभूत करत कसोटी मालिका १-० ने जिंकली होती.
२५ फेब्रुवारी १९३८ रोजी मुंबई मध्ये जन्मलेल्या फारुख इंजीनियरला ब्रिलक्रिम बॉय म्हटले जायचे. ते देशातील पहिले क्रिकेटर होते ज्यांच्याबरोबर ब्रिलक्रिमने करार केला होता. फ़ारुख इंजीनियरच्या पूर्वी हा करार फक्त इंग्लंडच्या डेनिस कॉम्पटन (Denis Compton) या क्रिकेटपटूबरोबर झाला होता.
फारुख इंजीनियर यांना देशातील सर्वोत्तम यष्टीरक्षक म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी भारताकडून ४६ कसोटी सामने खेळले ज्यामध्ये ३१.०८ च्या सरासरीने २,६११ धावा केल्या. या दरम्यान त्यांनी १६ यष्टीचित केले आणि ६६ झेल घेतले.
फारुख इंजीनियर यांची वेस्ट इंडिजविरूद्ध मद्रासमध्ये खेळलेली खेळी ही खास स्मरणातील खेळी आहे. कारण फारुख हे सलामीला आले होते आणि त्यांनी शतक झळकावले. हे शतक विशेष होते कारण त्यावेळी वेस्ट इंडिज संघामध्ये वेस हाल (Wes Hall) आणि चार्ली ग्रिफिथ (Charlie Griffith) सारखे गोलंदाज घातक गोलंदाजी करत होते.
फारुख इंजिनिअरने १९७५ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध मुंबईमध्ये अंतिम सामना खेळला. त्या सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये त्यांनी एकही धाव केली नाही. तो सामना वेस्ट इंडिज संघाने २०१ धावांनी जिंकला.
वाचनीय लेख –
भारताविरुद्ध भारतात सलग ४ डावात शतकं करणारा खेळाडू काळाच्या पडद्याआड
किस्से क्रिकेटचे १३- भारत इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवत होता, कर्णधार मात्र आराम खुर्चीत…
एका छोट्याश्या खिळ्याने घेतला होता प्रतिभावान क्रिकेटपटूचा जीव