इंडियन प्रीमियर लीगचा १५वा हंगाम संपल्यानंतर वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौल रणजी ट्रॉफीच्या बाद फेरीसाठी तयारी करत आहे. नुकत्याच पार पाडलेल्या आयपीएलच्या हंगामात कौल रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा भाग होता. परंतु त्याला या हंगामात खेळण्याच्या अपेक्षित संधी मिळाल्या नाहीत. अशात आता त्याने गोलंदाजी आणि संघाच्या निवड प्रक्रियेविषयी स्वतःचे मत मांडले आहे.
सोशल मीडिया ऍप ‘कू’ वरील चर्चासत्रात बोलताना सिद्धार्थ कौल (Siddarth Kaul) अनेक विषयांवर मत मांडले. संघाच्या निवड प्रक्रियेविषयी बोलताना तो म्हणाला की, आपण फक्त मेहनत करत राहिले पाहिजे आणि स्वतःच्या प्रदर्शानावर लक्ष दिले पाहिजे. बाकीच्या गोष्टी निवडकर्त्यांवर सोडल्या पाहिजेत. जर प्रदर्शन कायम राहिले, तर निवड नक्कीच होईल. आपण मैदानात असो किंवा बाहेर, स्वतःला सकारात्मक ठेवले पाहिजे. आयपीएलमध्ये आरसीबीसाठी खेळण्याविषयी तो म्हणाला की, त्याला विराट कोहलीसोबत खेळायला आवडते.
आयपीएल २०२२ मध्ये दिग्गज दिनेश कार्तिकने जबरदस्त प्रदर्शन करून स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली. कार्तिकविषयी बोलताना कौल म्हणाला की, कार्तिक असेच म्हटला होता की, संघ व्यवस्थापनाच्या हिशोबाने खेळले पाहिजे. संघ आणि व्यवस्थापनाला तुमच्याकडून काय पाहिजे, त्या हिशोबाने तयारी केली पाहिजे.
आरसीबी आयपीएलच्या इतिहासात नेहमीच एक भक्कम संघ राहिला आहे, पण त्यांना अद्याप एकही आयपीएल ट्रॉफी जिंकता आलेली नाहीये. मात्र, कौलने सांगतिल्याप्रमाणे १० महिन्यांनंतर म्हणजेच पुढच्या वर्षी आरसीबी संघ आयपीएल ट्रॉफी नक्की जिंकेल. सिद्धार्थने सांगितले की, “कोणताही संघ प्रत्येक सामना जिंकू शकत नाही, पण बेंगलोर मागच्या ४ हंगामांमध्ये पहिल्या ४मध्ये जागा बनवत आले आहे. सर्वात महत्वाची आहे ती विल पॉवर. आपण सकारात्मक विचारासह मैदानात उतरले पाहिजे. आगामी हंगामात आपण नक्की ट्रॉफी जिंकू.”
दरम्यान, आयपीएल २०२२च्या संपूर्ण हंगामात सिद्धार्थ कौल आरसीबीच्या ताफ्यात सहभागी होता, पण यादरम्यान त्याला फक्त एक सामना खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यात देखील त्याला एकही विकेट घेता आली नाही. यावर्षी प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळवण्यासाठी स्पर्धा अधिक असल्यामुळे त्याला संधी मिळू शकली नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताविरुद्ध भिडण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंची झाली कोरोना टेस्ट; काय आला रिपोर्ट?
भाजप नेत्याचा मोठा आरोप; म्हणाले, ‘IPL निकालात मोठी गडबड, समिती नेमली पाहिजे’