भारतीय संघाचे (team india) माजी दिग्गज क्रिकेटपटू अनिल कुंबळे (anil kumble) यांना २०१७ साली भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त केले गेले होते. त्यावेळी विराट कोहली (virat kohli) भारतीय संघाचा कर्णधार होता. कुंबळेंनी त्यावेळी अचानाक मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. विराटसोबत त्यांचे संबंध तनावपूर्ण असल्यामुळे त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता, असे सांगितले जाते. भारतीय संघाचे माजी व्यवस्थापक रत्नाकर शेट्टी (ratnakar shetty) यांनी स्वतःच्या पुस्तकात याविषयावर सविस्तर माहिती दिली आहे.
२०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर कुंबळेंनी संघाचे प्रशिक्षकपद सोडले होते. परंतु याची तयारी त्यापूर्वीच सुर झाल्याचे रत्नाकरांनी पुस्तकात सांगितले आहे. त्यांनी लिहिले की, “मे महिन्याच्या (२०१७) दुसऱ्या आठवड्यात मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेवन पंजाब यांच्यातील आयपीएल सामन्याच्या एक दिवस आधी मी विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांच्याशी वानखडे स्टेडियमवर भेटलो. विरेंद्र सेहवागने सांगितले की, डॉक्टर श्रीधरांनी त्याला भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करायला सांगितले आहे. त्यामुळे मी हैराण झालो.”
“काही दिवासांनंतर आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी मी हैदराबादला गेलो. सामन्यापूर्वी क्रिकेट प्रशासक समितीची बैठक झाली. कुंबळे आणि विराटला भारतीय क्रिकेटच्या आगामी धोरणांविषयी प्रेजेंटेशन द्यायचे होते. त्यावेळी विनोद राय आणि डायना इडुल्जी (क्रिकेट प्रशासन समिती सदस्य) उपस्थित होते. कुंबळेही होते आणि विराट ऑनलाइन जोडला गेला होता.”
“राय यांनी त्यावेळी मला विचारले की, २०१६ मध्ये संघाच्या प्रशिक्षकाच्या नियुक्तीसाठी कोणती पद्धत वापरली गेली होती. पुढे जे झाले ते, हैराण करणारे होते. राय यांनी सर्वांसमोर सांगितले की, ही प्रक्रिया पुन्हा एकदा घेतली जाईल. अनिल आणि मी चकित झालो. मला मे महिन्यातील विरेंद्र सेहवागसोबत झालेली चर्चा आठवली आणि मी अनिल कुंबळेला सांगितले. ही गोष्ट तर निश्चत आहे की, डॉक्टर श्रीधर यांनी स्वतःच्या मनाने विरेंद्र सेहवागला प्रशिक्षकपदासाठी अर्ज करायला लावले नसेल.”
“हे स्पष्ट होती की, काही लोक अनिलला प्रशिक्षकपदावर कायम ठेऊ इच्छित नव्हते. कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्यात एकमत नव्हते आणि असे वाटत होते की, कर्णधारचे पारडे जड होते. नंतर मला समजले की, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यापूर्वी लंडनमध्ये बैठक झाली होती. त्या बैठकीत विराट, अनिल, राहुल जोहरी, अमिताभ चौधरी आणि डॉक्टर श्रीधर उपस्थित होते. विराटचा आरोप होता की, अनिल खेळाडूंची बाजू घेत नाही आणि ड्रेसिंग रूममध्ये तनावपूर्ण वातावर असते. याव्यतिरिक्तही अनेक गोष्टी आहेत.” असे रत्नाकर त्यांच्या पुस्तकात म्हटले आहेत.
दरम्यान, अनिल कुंबळेंनी मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर रवी शास्त्रींना ही जबाबदारी स्वीकारली होती. शास्त्रींना संघासोबत मोठ्या काळापर्यंत मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली. मागच्या वर्षी पार पडलेल्या टी-२० विश्वचषकानंतर शास्त्रींचाही कार्यकाळ संपला आणि राहुल द्रविड सध्या ही जबाबदारी सांभाळत आहेत.
महत्वाच्या बातम्या –
‘गांगुलीला खेळायचा होता टी२० वर्ल्डकप पण द्रविडने…’ १५ वर्षांनी झाला गौप्यस्फोट
विश्वचषकात मालिकावीर ठरला की तो खेळाडू १०० टक्के टीम इंडियात येतोच, मग यंदा कोण मिळवेल तो मान?
PHOTOS: कॅप्टन रोहितच्या नेतृत्वात तयारीला लागली टीम इंडिया! पहिल्या सराव सत्राचे फोटो आले समोर