भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विस्फोटक फलंदाज विराट कोहली वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेतून बाहेर होते. रोहितच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्या याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पंड्याने मार्च महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदा वनडेत भारताचे नेतृत्व केले होते, तर रोहितने कौटुंबिक कारणामुळे ब्रेक घेतला होता. अशात शनिवारी (दि. 29 जुलै) पंड्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला या सामन्यात 6 विकेट्सने पराभवाचा धक्का सहन करावा लागला. या सामन्यातून रोहित बाहेर आणि विराट बाहेर का होते, आणि त्याने नेतृत्व का केले याचेही कारण सांगितले.
भारतीय संघाने पहिला वनडे सामना नावावर करत मालिकेत 1-0ने आघाडी घेतली होती. मात्र, दुसऱ्या वनडेत भारताला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे वेस्ट इंडिजने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या सामन्यात भारतीय संघाकडून मोठे बदल करण्यात आले होते. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती. त्यांच्या जागी संघात अक्षर पटेल आणि संजू सॅमसन (Sanju Samson) यांना खेळवण्यात आले. यासोबतच हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्याकडे कर्णधारपद सोपवले गेले. नाणेफेकीनंतर पंड्याने कर्णधारपद सोपवण्यामागील कारण सांगितले.
पंड्याने सांगितले कारण
हार्दिक पंड्या म्हणाला की, “रोहित आणि विराट कोहली यांनी विश्रांती घेतली आहे. कारण, त्यांना इतर खेळाडूंना संधी द्यायची होती. हे फक्त एवढंच आहे की, काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. विराट आणि रोहित खूपच क्रिकेट खेळत आहेत. त्यांनी विचार केला की, त्यांनी आता विश्रांती केली पाहिजे आणि तिसऱ्या वनडेसाठी ताजेतवाणे झाले पाहिजे. फक्त दुसऱ्या खेळाडूंना संधी देण्यासाठी ते आराम करत आहेत.”
नेतृत्वाची आकडेवारी
हार्दिक पंड्या याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. त्यावेळी भारतीय संघाने 5 विकेट्सने विजय मिळवला होता. तसेच, टी20त हार्दिकने 11 वेळा संघाचे नेतृत्व केले आहे. यामध्ये 8 वेळा संघाने विजय मिळवला आहे, तर 2 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. या 8 सामन्यांमध्ये त्याने विकेट्सही घेतल्या होत्या.
भारताने गमावला सामना
रोहित आणि विराटच्या अनुपस्थितीत विंडीजविरुद्ध दुसऱ्या सामन्यात उतरलेल्या भारताला सामना गमावण्याची नामुष्की ओढवली. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 40.5 षटकात दहाच्या दहा विकेट्स गमावत फक्त 181 धावा केल्या होत्या. हे आव्हान यजमान संघाने 36.4 षटकात सहजरीत्या पार करत सामना खिशात घातला.
पुढचा सामना कधी?
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात मालिकेचा तिसरा आणि अखेरचा वनडे सामना मंगळवारी (दि. 1 ऑगस्ट) त्रिनिदाद येथील ब्रायन लारा स्टेडिअमवर खेळला जाईल. (hardik pandya india captain in 2nd odi vs west indies read here)
महत्त्वाच्या बातम्या-
‘मी कासव आहे…’, म्हणत हार्दिक पंड्याने कुणावर फोडले पराभवाचे खापर? लगेच वाचा
दुसऱ्या वनडेत वेस्ट इंडिजकडून भारताचा निराशाजनक पराभव, 200 धावांचा आकडा पार करण्यात फलंदाज फ्लॉप