आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) हंगामातील सुपर-4 फेरीतील तिसरा सामना मंगळवारी (06 सप्टेंबर) भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात रंगणार आहे. भारतीय संघासाठी हा ‘करा अथवा मरा’ सामना असणार आहे. कारण भारताने सुपर-4 फेरीतील त्यांचा पहिला पाकिस्तानविरुद्धचा सामना गमावला आहे. त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारतीय संघाला कोणत्याही परिस्थितीत श्रीलंकेला पराभूत करावे लागणार आहे. तत्पूर्वी पिच रिपोर्ट (Dubai Pitch Report), हवामानाचा अंदाज (Weather Update) आणि भारत- श्रीलंकेतील आमने सामने (Head To Head Records) कामगिरीवर नजर टाकूया…
आमने सामने कामगिरी
भारत आणि श्रीलंका संघांनी आतापर्यंत 25 टी20 सामने खेळले आहेत. या पैकी 17 सामन्यात भारताने विजयश्री प्राप्त केली आहे. तर श्रीलंकेचा संघ फक्त 7 सामने जिंकू शकला आहे. आशिया चषकात टी20 स्वरूपात भारत आणि श्रीलंका संघ फक्त एक सामना खेळले आहेत. भारताने या सामन्यात 5 विकेट्सने विजय मिळवला होता.
दुबईचे हवामान आणि पिच रिपोर्ट
दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका संघात करा वा मरा सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होणार आहे. यादरम्यान दुबईत पाऊस पडण्याची कसलीही शक्यता नाही. रात्री आभाळ साफ असेल. मात्र दुसऱ्या डावादरम्यान मैदानावर दव पाहायला मिळतील. संध्याकाळी तापमान जवळपास 35 डिग्री सेल्सियर असण्याची शक्यता आहे. हवेची गती 11 किमी दर ताशी असू शकते. आर्द्रता 41 टक्के राहण्याचा अंदाज आहे.
दुबईच्या मैदानाबद्दल बोलायचे झाल्यास, आतापर्यंत या मैदानावर 78 टी20 सामने खेळले गेले आहेत. आशिया चषक 2022 मध्ये येथे आतापर्यंत 5 सामने झाले आहेत. यापैकी 4 सामने आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णयाला प्राधान्य देईल. दुसऱ्या डावादरम्यान या मैदानावर दव महत्त्वाची भूमिका बजावतात. मागील सामन्यात पाकिस्तान संघाने याच मैदानावर भारताविरुद्ध 182 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
हारना मना है! भारताची श्रीलंकाविरुद्ध ‘करा वा मरा’ लढत; कधी, कुठे होणार सामना? वाचा एका क्लिकवर
भारताविरुद्ध १९४ धावांची खेळी करणारा फलंदाज, मुलीच्या मृत्यूनंतर लागला होता धार्मिक प्रवचन द्यायला
टीका होत असलेल्या अर्शदीपला शमीने दिला धीर; म्हणाला, “आपला देश…”