भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने इंग्लंड आणि भारत यांच्यातील पहिल्या टी२०(IND vs ENG) सामन्यासाठी आपले भाकीत केले आहे. हा सामना गुरुवारी म्हणजेच ७ जुलै रोजी साउथॅम्प्टन येथील रोझ बाउल स्टेडियमवर होणार आहे. मर्यादित षटकांसाठी इयॉन मॉर्गनची जागा घेणारा जॉस बटलर यजमानांचे नेतृत्व करेल. मॉर्गननेही नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.
त्याचबरोबर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा सांभाळणार आहे. रोहित नुकताच कोविड१९ पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्याने त्याला आयसोलेशनमध्ये जावे लागले. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पाचव्या कसोटी सामन्यातही तो खेळला नाही. दरम्यान, आकाश चोप्रा म्हणाला की, मालिकेतील पहिल्या टी२० सामन्यात इंग्लंडचाच वरचष्मा असेल. दोन्ही संघांमध्ये मोठे षटकार असल्याने या सामन्यात किमान १५ षटकार लागतील, असा अंदाजही त्यानी व्यक्त केला.
चोप्रा आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला की,”माझा पहिला अंदाज असा आहे की जोस बटलर आणि डेव्हिड मलान मिळून ७५ हून अधिक धावा करतील. म्हणजे सध्या संघाचे नशीब ५०-५० असले तरी बटलर न थांबवता येणार आहे. गेल्या पाच सामन्यांवर नजर टाकली तर त्यांनी फक्त २ जिंकले आहेत पण बटलर एकटाच काम करतो. डेव्हिड मलान, मी त्याला खूप उच्च रेट करतो आणि मला वाटते की तो देखील धावा करेल.”
तो पुढे म्हणाला की, “मला वाटते की रोहित सलामीसाठी उपलब्ध असला तरीही इशान किशन आणि सूर्यकुमार यादव मिळून ७० हून अधिक धावा करतील. याचा अर्थ संजू खेळणार का? दीपक हुडा तिसऱ्या क्रमांकावर खेळेल की संजू सॅमसन?” चोप्राने इंग्लंडला फेव्हरेट म्हणण्यामागचे कारणही स्पष्ट केले. तो म्हणाला की, “मला वाटते की मॅन-टू मॅन मार्किंगच्या बाबतीत भारताची गोलंदाजी थोडी चांगली दिसत असली तरीही आणि त्यांच्या फलंदाजीचा प्रश्न आहे, तर विरोधी संघ थोडा मजबूत आहे.”
दरम्यान, या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा पुनरागमन करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी त्याचा कोरोना रिपोर्ट पॉसिटीव्ह अल्याने त्याला सामन्यात खेळता आले न्हवते. सध्या तो कोरोनातून मुक्त झाला असल्याची माहिती समोर आहे. त्यामुळे तो पुन्हा भारताचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बाप कर्णधार असला तरीही धोनी खेळला आहे ‘या’ ५ सिनीयर-ज्युनियर कर्णधारांच्या नेतृत्त्वाखाली
वेस्ट इंडीज विरुद्धच्या मालिकेसाठी शिखर धवन कर्णधार! चाहते नाराज, बीसीसीआयला केलं ट्रोल
रणजी ट्रॉफी गाजवणारा ‘तो’ खेळाडू टीम इंडियामध्ये यायलाच हवा, भारतीय दिग्गजाने केली मागणी