भारतीय संघ चेन्नईत इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेचा पहिला सामना खेळत आहे. अशातच संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी शुक्रवारी (५ फेब्रुवारी ) स्टार स्पोर्ट्स च्या कार्यक्रमात म्हंटले की, भारतीय संघाला आयपीएल स्पर्धेनंतर दोन आठवड्यांसाठी विश्रांती मिळायला हवी. कारण दीर्घ काळापासून बायो बबल मध्ये राहणे खूप कठीण आणि थकवणारे आहे. भारतीय संघ दुबई मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेपासून बायो बबलचे पालन करत आहे. त्यानंतर लगेचच भारतीय संघ ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर रवाना झाला होता.
एप्रिल महिन्यात आयपीएल स्पर्धेचे आयोजन
भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघामध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका ही ५ फेब्रुवारी पासून सुरू झाली आहे. यानंतर लगेचच संघाला ५ टी-२० सामने आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. यानंतर येत्या एप्रिल महिन्यापासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आणि संघातील मुख्य खेळाडू या स्पर्धेचा भाग असतील. २०२१ ची टी -२० विश्व कप स्पर्धा ही ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. त्या दृष्टीने भारतीय खेळाडूंना आयपीएल झाल्यानंतर २ आठवडयाच्या विश्रांती देण्याची मागणी रवी शास्त्री यांनी केली आहे.
भारतीय संघाची बेंच स्ट्रेंथ मजबूत
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाने विजय मिळवला. यामध्ये युवा खेळाडूंचा तितकाच मोलाचा वाटा होता. विराट कोहली पितृत्व रजेमुळे मायदेशी परतला होता. अजिंक्य रहाणे याने कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळली होती. अशातच संघातील मुख्य खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर झाले होते. त्यावेळी भारतीय संघाच्या युवा खेळाडूंना संधी मिळाली आणि त्यांनी संधीचे सोने करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता.
यावरून भारतीय संघाची बेंच स्ट्रेंथ किती आहे याचा सर्व संघांना अंदाज आलाच असेल. यावर रवी शास्त्री म्हणाले, “आमच्याकडे खूप खेळाडू आहे, प्रत्येक फॉरमॅट मध्ये चांगली बेंच स्ट्रेंथ भारतीय संघाकडे आहे. तसेच या वर्षी टी -२० विश्व कप स्पर्धेचे आयोजन भारतात होणार आहे. यामुळेच संघातील मुख्य खेळाडूंना विश्रांती मिळणे गरजेचे आहे.”
महत्वाच्या बातम्या:
आयपीएल 2021 साठीच्या लिलावात सहभागी होणार अर्जुन तेंडुलकर, इतकी असेल बेस प्राईस
मेरा नाम है वॉशिंग्टन, रिषभ पंतने भर मैदानात रचले नवीन गाणे, पाहा भन्नाट व्हिडिओ
BAN vs WI : मेहदी हसनची अष्टपैलू कामगिरी, पहिल्या कसोटीवर बांग्लादेशची मजबूत पकड