सोमवारी (१२ ऑक्टोबर) विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या माऱ्यापुढे कोलकाता नाईट रायडर्सने गुडघे टेकले. तब्बल ८२ धावांनी त्यांचा लाजिरवाणा पराभव झाला. त्या सामन्यात कोलकाताचा डावखुरा फिरकीपटू सुनिल नरेन खेळताना दिसला नाही. कारण नरेनला त्याच्या गोलंदाजी ऍक्शनवर झालेल्या आरोपामुळे त्या सामन्यातून बाहेर बसवण्यात आले होते. त्यामुळे काही चाहत्यांना नरेनची कमतरता भासली. पण, याउलट इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनने नरेनविषयी वादग्रस्त विधान केले आहे.
नरेन संघात नसल्यास केकेआरला मोठे नुकसान नाही होणार
स्टार स्पोर्ट्सवर बोलताना पीटरसन म्हणाला की, “प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर, मला नाही वाटत नरेन संघात नसल्यामुळे कोलकाता संघाला मोठे नुकसान होणार आहे. कारण त्यांच्याकडे आंद्रे रसेल आहे. रसेल हा एक असा खेळाडू आहे, ज्याच्याविषयी संघांच्या बैठकीत चर्चा होते. तो फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात सर्वश्रेष्ठ आहे.”
आधीसारखा नाही राहिला नरेन
“२०१२ साली कोलकाता संघात सहभागी झाल्यानंतर नरेन संघाचा अभिन्न भाग बनला. पण काही वर्षांपासून तो एका गोलंदाजासारखा दिसत नाही. तो आधीसारखी स्पिन गोलंदाजीही करताना दिसत नाही. तसेच शारजाहसारख्या फलंदाजीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या मैदानावरही त्याला चांगली फलंदाजी करता येत नाही,” असे पुढे बोलताना पीटरसन म्हणाला.
नरेनने वरच्या फळीत फलंदाजी करणे अयोग्य
तसेच पीटरसनने दिनेश कार्तिकच्या नरेनला वरच्या फळीत फलंदाजीसाठी पाठवण्याच्या निर्णयाचीही अवहेलना केली. तो म्हणाला की, “नरेनला वरच्या फळीत फलंदाजीसाठी पाठवणे चुकीचे आहे. मी वास्तवात त्याला सुरुवातीला फलंदाजीसाठी पाठवले नसते. तो १० पैकी एका सामन्यात जास्त धावा करतो आणि हे संघाच्या गतिशीलतेसाठी चांगली गोष्ट नाही.”
नरेनला आयपीएलच्या या हंगामात गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही विभागातही जास्त चांगली कामगिरी करता आलेली नाही. आतापर्यंत या हंगामात त्याने खेळलेल्या एकूण ६ सामन्यात फक्त ५ विकेट्स आणि ४४ धावांची कामगिरी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अररर! एकाच चेंडूवर झाला ‘दोन वेळा बाद’, पाहा कशी झाली फजिती
ट्वेंटी ट्वेंटीमध्ये ‘जाळ आणि धूर संगटच’ करणारा खेळाडू घेणार पंतची जागा?
असा परफेक्ट खेळाडू दुसरा नाही! धोनीसारख्या दिग्गजालाही करावे लागतेय ‘त्याचे’ कौतूक
ट्रेंडिंग लेख-
भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १७ – क्रिकेटचा गंभीर शिलेदार
दिल्लीला आयपीएल चषक जिंकायचा असेल, तर ‘या’ ३ गोष्टींकडे द्यावे लागले लक्ष
असे ३ खेळाडू ज्यांना किंग्ज इलेव्हन पंजाबने अंतिम ११ जणांच्या संघातून वगळले पाहिजे