मुंबई । वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात ऑली पोपने 91 धावांची खेळी करत संघाचा पहिला डाव सरावला. कसोटी कारकिर्दीतील हे त्याचे चौथे आणि मालिकेतील पहिले अर्धशतक होते. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पोपने जैव सुरक्षित वातावरणाबद्दल भाष्य केले.
इंग्लंडचा फलंदाज पोप म्हणाला की, ” जैव-सुरक्षित वातावरणात जगणे कठीण आणि आव्हानात्मक आहे. हॉटेल आणि स्टेडियम आमच्या जवळच आहेत. आम्ही कॉफी प्यायला बाहेर जाऊ शकत नाही आणि हवे असल्यास आपल्या कुटुंबास भेटू शकत नाही. हे सोपे नाही. अशा परिस्थितीत आपण खेळ आणि अपयशाबद्दल अधिक विचार करता.”
तो म्हणाला, “वेस्ट इंडिजविरुद्धच्या साऊथॅम्प्टन कसोटी सामन्याच्या दुसर्या डावात मी खेळ संपायच्या काही वेळ आधी बाद झालो. 20 मिनिटांनंतर मी हॉटेलच्या खोलीत होता. अशा परिस्थितीत फक्त फलंदाजीचा विचार करत राहिलो. तथापि, सहकारी खेळाडूंनी मला प्रोत्साहित केले आणि त्यातून बाहेर पडण्यास मला मदत केली.”
दरम्यान, खेळाडूंचा त्रास लक्षात घेता इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) पाकिस्तान मालिकेपूर्वी खेळाडूंना 4 दिवस घरी जाण्याची परवानगी दिली आहे. ‘बायो सिक्योर’ नियमामुळे पाकिस्तानविरुद्धची मालिका संपेपर्यंत खेळाडूंना घरी जाण्याची परवानगी नव्हती. पण यापूर्वी वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर पहिला कसोटी सामना संपल्यानंतर घरी गेला.
त्यानंतर, ईसीबीने त्याला दुसर्या कसोटीसाठी दंडही ठोठावला. बोर्डाने खेळाडूंना सांगितले की, वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेनंतर ते फक्त घरी जाऊ शकतील. त्यांना रेस्टॉरंट्स, पब किंवा सार्वजनिक ठिकाणी भेट देण्यास बंदी असेल. 2 ऑगस्टला ते सर्व मॅनचेस्टरला पोहोचतील.
महत्त्वाच्या बातम्या-
आपली चूक कबूल करणाऱ्या बकनरवर पठाणने साधला निशाना; म्हणतो, ७ वेळा…
-आयपीएल २०२० खेळण्यासाठी खेळाडूंना देणार का परवानगी, पहा ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडचा काय आहे निर्णय
-सुरेश रैनाचा तो फोटो होताय जबरदस्त व्हायरल
ट्रेंडिंग लेख-
-टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ३- गब्बरची कसोटी क्रिकेटमध्ये जबर एन्ट्री
-निराशाजनक! पदार्पणाच्या वनडे सामन्यातच नर्वस नाइंटिजचे शिकार झालेले ५ क्रिकेटपटू
-अगदी सौरव तिवारीपासून ‘या’ ६ कर्णधारांच्या अंडर खेळलाय धोनी