बांगलादेश आणि भारत यांच्या दरम्यान चट्टोग्राम येथे सुरू असलेल्या पहिला कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने वर्चस्व गाजवले. पहिल्या दिवशी श्रेयस अय्यर व चेतेश्वर पुजारा यांनी दाखवलेल्या शानदार खेळानंतर भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी गोलंदाजांच्या बळावर सामन्यावर आपली पकड मजबूत केली. बांगलादेशच्या तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलेल्या मोहम्मद सिराजने प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय फलंदाजांनी कसोटीच्या आपल्या पहिल्या डावात 404 धावा केल्या. भारतीय संघासाठी चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर व रविचंद्रन अश्विन यांनी अर्धशतके झळकावली. त्याचवेळी मोहम्मद सिराजने चमक दाखवली. नव्या चेंडूने धारदार गोलंदाजी करत त्याने पहिल्याच चेंडूवर भारतीय संघाला यश मिळवून दिलेले. त्यानंतरही त्याने दोन प्रमुख फलंदाजांना बाद केले. त्याने 14 चेंडूवर 3 बळी मिळवले.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर सिराज पत्रकारांना सामोरा गेला. त्याने आपल्या या यशाचे श्रेय सरावाला दिले. तो म्हणाला,
“लाल चेंडूने गोलंदाजी करायला मला आवडते. मी लाल चेंडूने अधिक प्रभावी गोलंदाजी करू शकतो. कारण, यामध्ये तुम्हाला चेंडूची लांबी आणि अचूक टप्पा राखावा लागतो.”
तो पुढे म्हणाला,
“सातत्याने एकाच जागेवर गोलंदाजी करण्याची माझी रणनीती होती. ही खेळपट्टी अशी आहे, जेथे तुम्ही अधिक प्रयत्न केल्यास तुमची कामगिरी खराब होऊ शकते. सातत्याने यष्ट्यांवर गोलंदाजी केल्यास फलंदाजांना पायचित करण्याची संधी मिळते.”
दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस बांगलादेशने 8 बाद 133 अशी मजल मारली होती. भारतीय संघाकडे अद्याप 271 धावांची आघाडी असून, बांगलादेशला लवकरात लवकर सर्वबाद करण्याचा प्रयत्न भारतीय गोलंदाज करतील.
(Mohmmad Siraj Talk About His Succes In Test Cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! भारतीय दिग्गजाने ‘या’ क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा दिला राजीनामा, बोर्डाने दिली माहिती
‘तुझी बहीण असल्याचा मला…’, अर्जुन तेंडुलकरच्या शतकानंतर साराची लक्षवेधी पोस्ट; एकदा पाहाच