भारतीय संघाचा माजी फलंदाज सुब्रमण्यम बद्रिनाथने पहिल्याच टी२० सामन्यात सामनावीर पुरस्कार मिळविण्याच्या आपल्या विक्रमाला कुणीही मोडू शकत नसल्याचे भाष्य केले आहे.
भारताकडून २ कसोटी, ७ वनडे व १ टी२० खेळलेल्या हा खेळाडू म्हणतो, मी भूतकाळात रमणारा खेळाडू नाही. मी आजही विचार करतो की मी चांगलं काय करु शकतो. क्रिकेट वर्तुळात नेहमी चर्चा होते की मी अजून कसोटी क्रिकेट खेळायला हवे होते. परंतु हे माझ्या हातात नाही. मीच माझी निवड करु शकत नाही.
“मला जेव्हाही खेळण्याची संधी मिळाली, मी माझ्या पुर्ण क्षमतेने खेळलो. मी सीएसकेकडून १२० सामने खेळलो असेल. कुणी विचारही केला नसले मी एवढे टी२० क्रिकेट खेळेल. मी भारताकडून एकच टी२० सामना खेळलो व त्यातही मला सामनावीर पुरस्कार मिळाला आहे. हा विक्रम कुणीही मोडू शकत नाही,” असेही तो पुढे म्हणाला.
पोर्ट ऑफ स्पेनमध्ये ४ जून २०११ रोजी बद्रिनाथ एक टी२० सामना भारताकडून खेळला. त्यात त्याने ३७ चेंडूत ४३ धावा केल्या होत्या. त्यात तो सामनावीरही ठरला होता.