मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल २०२०च्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. तर दुसऱ्या बाजूला सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर व दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या एका जागेसाठी लढणार आहे. जशी या ४ संघांमध्ये विजेतेपदासाठी मोठी स्पर्धा सुरु आहे, काहीशी तशीच स्पर्धा ऑरेंज कॅप व पर्पल कॅप जिंकण्यासाठी फलंदाज व गोलंदाजांमध्ये सुरु आहे. यात स्पर्धेबाहेर पडलेला किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुलचाही समावेश आहे. सध्या राहुल ऑरेंज कॅपचा सर्वात प्रबळ दावेदार आहे.
केएल राहुलने या आयपीएल हंगामात १४ सामन्यात ५५.८३च्या सरासरीने तब्बल ६७० धावा केल्या आहेत. तसेच स्पर्धेबाहेर जावूनही तो ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत अव्वल स्थानी आहे. परंतू असे असले तरी त्याचा ऑरेंज कॅपसाठी एक धोका ठरणार आहे.
डेविड वॉर्नरला आहे संधी
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरला ही कॅप जिंकण्याची मोठी संधी चालून आली आहे. गेल्या काही सामन्यात जबरदस्त फलंदाजी करुन त्याने संघाला प्ले ऑफमध्ये नेले आहे. त्याने १४ सामन्यात ४४.०८च्या सरासरीने ५२९ धावा केल्या आहेत. तसेच तो केएल राहुलपेक्षा केवळ १४१ धावांनी मागे आहे. जर वॉर्नरने बेंगलोर संघाविरुद्ध शानदार खेळी केली व ते सामना जिंकले तर त्याला ऑरेंज कॅप जिंकणं फारस अवघड ठरणार नाही. कारण बेंगलोरविरुद्ध सामना जिंकले तर वॉर्नरला क्वॉलिफायर दोनमध्ये पुन्हा खेळण्याची संधी मिळणार आहे. वॉर्नरचा सध्याचा फॉर्म पाहता त्याचा संघ यशस्वी झाला तर स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्यापासून त्याला कोणीही रोखू शकत नाही.
कोहलीच्या संघाला घ्यावे लागणार कष्ट
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला जर आयपीएलचे विजेतेपद जिंकायचे असेल तर सर्वप्रथम त्यांना हैदराबाद व डेविड वॉर्नरला इलिमीनेटर एक मध्येच रोखावे लागणार आहे. बेंगलोरचा संघ जिंकला किंवा त्यांनी वॉर्नरला धावा करण्यापासून रोखले तर केएल राहुलची ऑरेंज कॅप जवळपास पक्की होऊ शकते.
शिखर धवनही आहे स्पर्धेत
दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर शिखर धवनही या स्पर्धेत आहे. शिखरने साखली फेरीचे १४ व प्ले ऑफचा एक मिळून १५ सामन्यात ५२५ धावा केल्या आहेत. शिवाय त्याच्या संघाला क्वॉलिफायर दोनचा सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. क्वॉलीफायर एकमध्ये जर तो शुन्यावर बाद झाला नसता तर त्याला केएलच्या व त्याच्या धावांमधील अंतर कमी करण्याची मोठी संधी होती.
महत्त्वाच्या बातम्या –
-ब्रेकिंग ! गौतम गंभीर सेल्फ आयसोलेट, स्वतः ट्विट करून दिली माहिती
-ऑस्ट्रेलियाला जाण्याआधी कोहलीचे मोठे भाष्य, ‘या’ कारणामुळे दौरे मोठे नसावेत
-“वैयक्तिक कीर्तिमान महत्वाचे परंतु…”, दिल्लीविरुद्धच्या विजयानंतर सूर्यकुमारची खास प्रतिक्रिया