सोमवारी (दि. 17 एप्रिल) स्पर्धेतील 24 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला चेन्नई सुपर किंग्स संघाकडून 8 धावांनी पराभवाचा धक्का बसला. तब्बल 227 धावांचा पाठलाग करताना आरसीबीच्या फलंदाजांनी चांगली झुंज दिली. असे असले तरी, आरसीबीच्या फलंदाजी क्रमावर आता भारताचा माजी सलामीवीर व पंजाब किंग्सचा फलंदाजी प्रशिक्षक वसीम जाफर याने टीका केली आहे.
चेन्नईच्या फलंदाजांनी दिलेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहली स्वस्तात बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर अष्टपैलू महिपाल लोमरोर याला बढती दिली. मात्र, तो अपयशी ठरला व खातेही न खोलता तंबूत परतला. संघाच्या या रणनीतीवर जाफर यांनी टीका केली. एका क्रिकेट संकेतस्थळाशी बोलताना तो म्हणाला,
“महिपाल लोमरोर हा स्वतःच्या राज्य संघासाठी देखील तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत नाही. त्याच्यासाठी ही खूप मोठी जबाबदारी होती. तो फिनिशर म्हणून खेळू शकतो. संघाला रजत पाटीदार याची कमतरता जाणवत आहे. त्यामुळेच विराट, फाफ व मॅक्सवेल यांच्यावर दबाव वाढतोय. एकत्रित अपयशी ठरल्यास फलंदाजी क्रम कोसळत आहे.”
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्स संघाने निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 226 धावा केल्या होत्या. सीएसकेसाठी डेवॉन कॉनवे व शिवम दुबे यांनी आक्रमक अर्धशतके झळकावली. या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोर संघाला 218 धावाच करता आल्या. यावेळी फाफ डू प्लेसिस (62) आणि ग्लेन मॅक्सवेल (76) यांनी वादळी फलंदाजी केली, पण संघाला विजय मिळवून देण्यासाठी ती पुरेशी नव्हती. या दोघांव्यतिरिक्त दिनेश कार्तिक व सुयश प्रभुदेसाई यांनी विजयासाठी प्रयत्न केले. मात्र, पथिराना याच्या अचूक गोलंदाजीमुळे आरसीबीला विजय मिळवता आला नाही.
(Punjab Batting Coach Wasim Jaffer Slam RCB Batting Lineup After Lomror At 3)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाचव्या विजयासह रायगड मराठा मार्वेल्स प्ले-ऑफस मध्ये दाखल
सांगली सिंध सोनिक्स संघाची परभणी पांचाला प्राईड संघावर मात