अहमदाबाद| इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२च्या अंतिम सामना आज (रविवारी, २९ मे) राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स या संघामध्ये होणार आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर सायंकाळी आठ वाजता खेळला जाणार आहे.
राजस्थानचा संघ १४ वर्षांनंतर आयपीएलच्या अंतिम सामन्यात खेळणार आहे. त्यांनी २००८च्या पहिल्या हंगामाचे विजेतेपद शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. त्यानंतर त्यांना विजेतेपदासाठी वाटच पाहावी लागली आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान संघासाठी हा आयपीएल सामना विशेष आहे. यासाठी या सामन्यात त्यांना पाठींबा देण्यासाठी २००८ च्या चॅम्पियन संघातील खेळाडू स्टेडियममध्ये उपस्थित राहणार आहे.
राजस्थान संघाच्या फ्रॅंचायजीने २००८च्या विजेत्या संघातील खेळाडूंना आमंत्रित केले आहे. त्यात मुनाफ पटेल, रविंद्र जाडेजा, यूसुफ पठान, स्वप्निल असनोडर, दिनेश साळुंखे आणि सिद्धार्थ त्रिवेदी या भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. तर कामरान अकमल, शेन वॉटसन, सोहेल तन्वीर, डॅरेन लेहमन आणि दिमित्री मस्करेहन्स या परदेशी खेळाडूंची येण्याची शक्यता कमी आहे. त्याचबरोबर संघाला वॉर्नची कमी जाणवणार आहे.
“आम्ही एका कुटुंबाप्रमाणे आहोत. तसेच जो एकदा का रॉयल्स संघात आला तो शेवटपर्यंत रॉयल्सचा भाग बनून जातो. आम्हाला वाटते की संघाच्या या प्रवासात आणि विजयात सगळ्यांनी आमच्यासोबत सामील व्हावे”, असे राजस्थान रॉयल्स संघाचे व्यवस्थापक रोमी भंडर यांनी म्हटले आहे.
“आम्ही सगळ्यांनाच वॉर्नची कमी जाणवणार असून त्याच्यासाठी आम्ही शोकसभा आयोजित केली आहे”, असेही भंडर हे पुढे म्हणाले.
राजस्थानचा या आयपीएलमधील प्रवास लक्षणीय ठरला आहे. त्यांनी १४ पैकी ९ साखळी सामन्यांत विजय मिळवत गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचत प्लेऑफमध्ये प्रवेश केला. नंतर ते पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरातकडून ७ विकेट्सने पराभूत झाले होते. मात्र या निकालाने निराश न होता त्यांनी दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला ७ विकेट्सने पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला.
या हंगामात राजस्थानकडून जोस बटलरने तुफानी फलंदाजी करत संघाला महत्वाच्या सामन्यात विजयात मिळवून दिला आहे. त्याने १६ सामन्यात सर्वाधिक ८२४ धावा काढल्या आहेत. तर गोलंदाजीत युजवेंद्र चहल १६ सामन्यांत २६ विकेट्स घेत या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसरा क्रमांक गाठला आहे.
राजस्थानची गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी जुळून आली तर ते दुसऱ्यांदा विजेतेपदावर नाव कोरण्याची कामगिरी करू शकतात
तसेच गुजरातचा संघ आयपीएल पदार्पणातच अंतिम सामन्यात पोहोचला आहे.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL Final | फक्त २५ धावा अन् बटलर मोडेल वॉर्नरचा मोठा विक्रम, विराटलाही पछाडण्याची संधी
‘जा आणि गुजरातला फोडून या, शेन वॉर्नसाठी तुम्ही जिंकलंच पाहिजे’, IPL फायनलपूर्वी अख्तरची प्रतिक्रिया
‘जा आणि गुजरातला फोडून या, शेन वॉर्नसाठी तुम्ही जिंकलंच पाहिजे’, IPL फायनलपूर्वी अख्तरची प्रतिक्रिया