टी20 विश्वचषकात रविवारी (6 नोव्हेंबर) भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात अखेरचा साखळी सामना पाहायला मिळाला. या सामन्यात भारताने 71 धावांनी मोठा विजय मिळवला. भारतीय संघाला आता इंग्लंडसोबत स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना खेळायचा आहे. उपांत्य सामना जिंकण्यासाठी भारतीय संघ शक्य ते सर्व प्रयत्न करेल. मात्र, त्याचवेळी संघात यष्टीरक्षक म्हणून कोणाची वर्णी लागणार हा प्रश्न समोर येत आहे. भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक व समालोचक रवी शास्त्री यांनी मात्र उपांत्य फेरीच्या सामन्यात रिषभ पंत हा संघाचा भाग असावा असे म्हटले.
भारतीय संघात या विश्वचषकासाठी दोन यष्टीरक्षकांना जागा मिळाली होती. साखळी फेरीतील पहिल्या चार सामन्यांमध्ये संघ व्यवस्थापनाने अनुभवी दिनेश कार्तिक याला संधी दिली. मात्र, आपल्याला मिळालेल्या संधीचे तो सोने करू शकला नाही. त्यामुळे अखेरच्या साखळी सामन्यात त्याच्या जागेवर रिषभ पंतची निवड केली गेली. परंतु, तो देखील या सामन्यात अपयशी ठरला. 5 चेंडूवर केवळ 3 धावा करत तो माघारी परतला. त्यामुळे त्याच्या संघातील जागेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. रिषभ आशिया चषकापासून संघासाठी अपेक्षित योगदान देऊ शकला नाही.
रिषभच्या या खराब कामगिरीनंतरही भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिनेश कार्तिक आधी त्याला उपांत्य फेरीत संधी देण्याचे सुचवले. शास्त्री म्हणाले,
“कार्तिक एक टीम मॅन आहे. मात्र, ज्यावेळी तुम्ही इंग्लंड व न्यूझीलंडविरुद्ध खेळता, त्यावेळी तुमच्याकडे एक असा खेळाडू हवा जो सामना बदलतो. रिषभची डाव्या हाताची फलंदाजी भारतीय संघासाठी एक्स फॅक्टर ठरू शकतो.”
भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना 10 नोव्हेंबर रोजी ऍडलेड येथे होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना दुपारी दीड वाजता सुरू होईल. (Ravi Shashtri Backs Rishabh Pant For Semi Finals)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! रे*प केसचा आरोपी धनुष्का गुणतिलकाची श्रीलंका संघातून हकालपट्टी, जामीनही नाही मिळाला
वाईट काळात केवळ ‘या’ व्यक्तीने वाढवला विराटचा आत्मविश्वास; स्वतः केला खुलासा