भारत आणि श्रीलंका संघातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटचा सामना शुक्रवारी (२४ जुलै) श्रीलंका संघाने 3 विकेट्सने जिंकला. परंतु भारतीय संघाला ही मालिका 2-1 ने जिंकण्यात यश मिळाले आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताचा संघ 43.1 षटकांत फक्त 225 धावांवर सर्व गडी बाद झाले. याला प्रत्युत्तर देत श्रीलंका संघाने 39 षटकांत 7 गडी गमावून हे लक्ष्य गाठले. याच दरम्यान श्रीलंकेकडून अविष्का फर्नांडोने 98 चेंडूत 76 धावांची सर्वाधिक खेळी केली.
सूर्यकुमार यादव बनला ‘मालिकावीर’
सूर्यकुमार यादवने या मालिकेत उत्कृष्ट फलंदाजी करत चांगली कामगिरी केली. त्याने 3 सामन्यांत 62.0 च्या सरासरीने आणि 122.77 च्या स्ट्राईक रेटने एकूण 124 धावा केल्या. या मालिकेत त्याने 18 उत्कृष्ट चौकार लगावले आहेत.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने संघासाठी 20 चेंडूंमध्ये 31 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याचबरोबर दुसर्या एकदिवसीय सामन्यात त्याने संघासाठी 44 चेंडूत 53 धावांचा डाव खेळला होता. मालिकेच्या अंतिम एकदिवसीय सामन्यात सूर्यकुमार यादवने 37 चेंडूत 40 धावांचे योगदान दिले आहे. (‘Series hero’ Suryakumar Yadav is still upset for this reason)
या उत्कृष्ट कामगिरीमुळे सूर्यकुमार यादव यांना ‘मालिकावीर’ हा पुरस्कार मिळाला आहे. परंतु असे असूनही त्याने दिलगिरी व्यक्त केली की, या मालिकेत त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्याला चांगली सुरुवात मिळाली पण त्याला 80-100 धावांचा पल्ला गाठता आला नाही.
मोठी धावसंख्या उभा करायची होती
मालिकावीर पुरस्कार मिळाल्यानंतर सूर्यकुमार यादव आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. तो म्हणाला की, “मला असे वाटते की, मी एका प्रक्रियेचा भाग म्हणून गेली दोन वर्षे कठोर परिश्रम घेत आहे आणि माझा खेळ सोपा ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. हे माझ्यासाठीही काम करत आहे. मी मागच्या सामन्यांत धावा केल्या, परंतु मला ही धावसंख्या आणखी मोठी करायची होती. परंतु मी अजूनही शिकत आहे. आमच्या शिबिराचे वातावरण खरोखर सकारात्मक आहे आणि मी टी 20 मालिकेत मोठी धावसंख्या उभा करण्याच्या प्रतीक्षेत आहे.”
आता भारत आणि श्रीलंका संघामध्ये 3 टी 20 सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेचा पहिला सामना 25 जुलै रोजी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-विराटसेनेला दुखापतींनी घेरले; भारतीय दिग्गज म्हणाले, भुवीसह ‘या’ ३ खेळाडूंना इंग्लंडला पाठवा
-“आधी बाबर आजमला २०-३० हजार धावा करु द्या, मग त्याची तुलना विराट कोहलीशी करा”