शुक्रवारी (23 सप्टेंबर) नागपुरमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान दुसरा टी20 सामना खेळला जाणार आहे. भारतीय संघसाठी हा सामना करा किंवा मरा अशा स्वरूपाचा असेल. भारतीय संघाने हा सामना गमावला तर मालिका ऑस्ट्रेलियाच्या नावावर होईल. परंतु, भारतीय संघ विजयी ठरला तर मालिका बरोबरीत येईल. अशा परिस्थितीत हैदराबाद येथे होणारा मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना निर्णायक ठरेल. टी-20 हैदराबाद येथे होणार आहे. आता या दुसऱ्या सामन्याआधी भारतीय फलंदाज फलंदाज सूर्यकुमार यादवने भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे.
सूर्यकुमार यादवने नागपूर सामन्याआधी आभासी पत्रकार परिषदेत बोलताना प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या तंदुरुस्तीबद्दल माहिती दिली आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाला बुमराहची उणीव भासली होती. कारण, तो दुखापतीनंतर संघात परतला असला तरी, सामना खेळण्यासाठी तो पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता. अशा स्थितीत तो पहिला सामना खेळू शकला नाही. मात्र आता सूर्यकुमार यादवने बुमराहच्या तंदुरुस्ती विषयीच्या सर्व शंका खोडून काढल्या आहेत. त्याच्या तंदुरुस्तीविषयी काळजी करण्यासारखे काही नाही, असे म्हटले.
जसप्रीत बुमराह मागील काही काळापासून दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर तो कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळलेला नाही. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आपली तंदुरुस्ती सिद्ध केल्यानंतर तो आता पुनरागमनासाठी सज्ज आहे.
नागपूर टी20 साठी संभाव्य भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, दीपक चहर.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘याला काय अर्थ आहे, त्याला संधी दिली पाहिजे’, वाचा कुणाविषयी बोलला मॅथ्यू हेडन
एसए टी20 लिलावात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधारच राहिला ‘अनसोल्ड’! आता म्हणतोय…
रिषभ पंतने ‘या’ लहान चाहत्याचा दिवस बनवला खास! नागपूरात पोहोचताच केलय भारी काम