भारताचा वेगवान गोलंदाज विनय कुमारने सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. १७ वर्षे क्रिकेट कारकिर्द घडवल्यानंतर त्याने हा निर्णय घेतला. त्याने त्याच्या कारकिर्दीत ९०० पेक्षाही अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
विनय कुमारने २००४ साली कर्नाटककडून बंगालविरद्धच्या सामन्यातून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर २००५ मध्ये त्याने अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये केरळविरुद्ध पदार्पण केले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याला २०१० साली श्रीलंकाविरुद्धच्या टी२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. विनयने त्याच्या कारकिर्दीतील अनेक वर्षे देशांतर्गत क्रिकेट कर्नाटकसाठी खेळले. तसेच कारकिर्दीतील शेवटचा हंगाम त्याने पाँडिचेरी संघाकडून खेळला.
विनयने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन प्रसिद्धीपत्रक जाहीर करत त्याच्या निवृत्तीची घोषणा केली. ‘दावणगेरे एक्स्प्रेस’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या विनयने त्याच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की ‘दावणगेरे एक्स्प्रेस गेले २५ वर्ष धावल्यानंतर आणि क्रिकेट कारकिर्दीतील अनेक स्थानकं पार केल्यानंतर निवृत्ती असं नाव असलेल्या स्टेशनवर येऊन थांबली आहे. हा निर्णय घेणे सोपे नव्हते. पण प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात असा दिवस येतो.’
त्याने पुढे म्हटले आहे की ‘माझ्यासाठी क्रिकेट हा केवळ खेळ नाही, जगण्याचा मार्ग आहे. त्याने मला खुप काही शिकवले आहे. अनेक चढ-उतार आहे, अनेक यश-अपयशाचा सामना केला, अनेक चांगल्या-वाईट दिवसांचा अनुभव घेतला आहे. यातून मी एक उत्तम व्यक्ती म्हणून घडत गेलो. क्रिकेटपटू म्हणून मला आलेल्या प्रत्येक अनुभवाबद्दल मला अभिमान आहे.’
याबरोबरच विनयने त्याच्या कारकिर्दीतील भेटलेल्या प्रशिक्षकांचे, मार्गदर्शकांचे, संघसहकाऱ्यांचे, कर्णधारांचे आभार मानले आहेत. याबरोबरच त्याने भारताकडून खेळायला मिळणे ही अभिमानाची गोष्ट असल्याचे म्हणत बीसीसीआयचे आभार मानले आहेत. तसेच त्याने कर्नाटक क्रिकेट असोसिएशन, पाँडिचेरी क्रिकेट असोसिएशनचेही त्याने आभार मानले.
याबरोबर त्याने आयपीएलमध्ये प्रतिनिधित्व केलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, कोची टस्कर्स या संघांबद्दलही कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर त्याने पत्रकार, संघव्यवस्थापक, मैदानातील कर्मचाऱ्यांचेही आभार मानले असून त्याने चाहत्यांप्रतीही प्रेम व्यक्त केले आहे.
Thankyou all for your love and support throughout my career. Today I hang up my boots. ????????❤️ #ProudIndian pic.twitter.com/ht0THqWTdP
— Vinay Kumar R (@Vinay_Kumar_R) February 26, 2021
विनयची कारकिर्द
त्याने त्याच्या कारकिर्दीत १ कसोटी, ३१ वनडे आणि ९ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले. यात त्याने मिळून ३८ विकेट्स घेतल्या. तसेच त्याने त्याच्या कारकिर्दीत प्रथम श्रेणीचे १३९ सामने खेळले असून २२.४४ च्या सरासरीने ५०४ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच ३३११ धावाही केल्या आहेत. यात त्याच्या २ शतकांचा आणि १७ अर्धशतकांचा समावेश आहे.
याबरोबरच त्याने अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये १४१ सामने खेळले असून २२५ विकेट्स घेतल्या आहेत आणि ११९८ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट प्रकारात त्याने १८१ सामन्यात १९४ विकेट्स घेतल्या आहेत.
त्याने त्याच्या कारकिर्दीत कर्नाटक संघाचे नेतृत्वही केले. त्याच्या नेतृत्वाखाली कर्नाटकने २०१३-१४ आणि २०१४-१५ साली रणजी ट्रॉफीचे विजेतेपद मिळवले. या दोन वर्षी त्याने त्याच्या नेतृत्वाखाली कर्नाकट संघाला विजय हजारे ट्रॉफीचे आणि इराणी कपचे विजेतेपदही मिळवून दिले.
आयपीएलमध्ये या संघांचे केले प्रतिनिधित्व
विनयने आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि कोची टस्कर्स या संघांचे प्रतिनिधित्व करताना १०५ सामने खेळले असून १०५ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजही आहे. त्याने बंगलोरकडून ८० विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
विराटच्या परदेशी चाहतीने लुटला इंग्लंडच्या पराभवाचा आनंद, मग काय भिडले ट्विटरवॉर
अंपायरने नाबाद देऊनही घेतला रिव्ह्यू अन् पडले तोंडघशी; मग पंचाने मैदानावरच केला जल्लोष, पाहा व्हिडिओ
गेलचे ‘सलवार चॅलेंज’ बघून हसू आवरणार नाही, पहा मजेशीर व्हिडीओ