सध्या क्रिकेट विश्वात बर्याच देशात एक सूत्र अंमलात आणले जाते. ज्याला भारतीय संघाने सुद्धा अंमलात आणले पाहिजे. कारण या सूत्राचा वापर केल्याने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघाच्या कामगिरीवर याचा परिणाम झालेला दिसून येत आहे. हे सूत्र दुसरे तिसरे काही नसून क्रिकेटच्या वेगवेगळ्या प्रकारात वेगळा- वेगळा कर्णधार नेमण्याचे आहे.
इंग्लंडच्या वनडे संघाचा कर्णधार ऑयन मॉर्गन आहे, तर ऑस्ट्रेलिया वनडे संघाचा कर्णधार ऍरॉन फिंच आहे. कसोटीत टीम पेन याला कर्णधार करून आपल्या क्रिकेटच्या रणनितीला ऑस्ट्रेलियाने मैदानात अंमलात आणले आहे.
या सूत्राची चर्चा भारतीय संघाबद्दल केली जात आहे. कारण तिन्ही प्रकारात विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे कर्णधार पदाचा दबाव विराटवर येताना दिसत आहे.
त्यामुळे आजच्या या लेखामधून आपण भारतीय संघाला तिन्ही प्रकारात वेगळा कर्णधार का असावा याबद्दल कोणती तीन कारणे आहेत? ते जाणून घेणार आहोत.
1. विराटवर वाढता दबाव
भारतासारख्या देशात क्रिकेटला एक धर्म म्हणून पाहिले जाते आणि क्रिकेटर म्हणून तुम्हाला कोट्यावधी अपेक्षांचा भार घेवून चालावे लागते. त्या देशाचा कर्णधार होणे ही एक मोठी जबाबदारी असते. या जबाबदारीला विराट कोहली काही वर्षांपासून निभावत आहे. ज्यामध्ये त्याला खूप चढ-उतारांचा सामना करावा लागला आहे. कारण तो एक खेळाचा भाग आहे.
परंतु वेगाने सामील होत असलेल्या आधुनिक क्रिकेटमध्ये कुठे ना कुठे ती वेळ आली आहे, जेव्हा एक खेळाडू म्हणून विराटच्या कामगिरीवर हा जबाबदारीचा दबाव दिसून येतोय. तसेच दुसर्या बाजूला कसोटी क्रिकेटमध्ये चांगल्या प्रकारे जबाबदारी निभावली. आता वेळ आहे विराटवरील दबाव जर कमी करायचा असेल, तर मर्यादित षटकातील कर्णधार पदाची जबाबदारी रोहितकडे द्यावी ज्यामधे सर्वांचेच हित आहे.
2. कर्णधार म्हणून रोहितची कामगिरी
आयपीएल स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून जास्त संधी मिळाली नाही. पंरतु कर्णधार म्हणून जितकी संधी मिळाली आहे, त्यामध्ये संघाला विजय मिळवून देत आपल्या कौशल्याची छाप सोडली.
मर्यादित षटकांत भारतीय कर्णधार पदाची धुरा सांभाळताना त्याने चाहत्यांना निराश केले नाही. मग तो 2018 साली आशिया कप मध्ये मिळवलेला विजय असो किंवा नंतर 2018 मध्ये झालेला निदाहास चषक. रोहितने मिळालेल्या संधीवर चांगल्या प्रकारे नेतृत्त्वाचा ठसा उमटवला आहे.
त्याचबरोबर दुसर्या बाजूला मर्यादित षटकात विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली काही मालिका सोडल्या, तर कोणती मोठी स्पर्धा जिंकली नाही, 2014 चा आशिया चषक आणि 2019 आयसीसी वनडे विश्वचषक मध्ये झालेल्या पराभवाचे उदाहरण पाहिले जाऊ शकते.
3. मोठ्या सामन्यात विराटचे हरवणे
एक नाही तर कित्येकदा मैदानावर बघितले गेले आहे की मोठ्या सामन्यात कर्णधार म्हणून विराट कोहली कुठे तर हरवून जातो. ज्याचा परिणाम बाकी संघाच्या कामगिरीवर होतो. ज्या तीन स्पर्धेतील सामन्याबद्दल चर्चा केली आहे. जर त्या सामन्यात विराट कोहलीचे नेतृत्त्व आणि त्याचे निर्णय पाहिले तर अजून चांगले समजेल.
सन 2014 साली आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध त्याने आर अश्विनला शेवटचे षटक देण्याचा निर्णय फसला होता. त्यामुळे शाहिद आफ्रिदीने सहजरीत्या आपल्या संघाला सामना जिंकून दिला होता. त्यानंतर सन 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात विराटचे अनेक निर्णय असे होते, ज्यामध्ये सामन्याचा दबाव न झेपण्याचा प्रभाव स्पष्टपणे दिसत होता.
असेच काहीसे सन 2019 मधील विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात पाहायला मिळाले. ज्यावेळी एमएस धोनीला सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी पाठवल्यानंतर खूप वाद झाला होता. या तीन कारणांमुळे स्पष्ट होते की, भारताला आता कर्णधारपद वाटण्याचे सूत्र अंमलात आणावे लागेल. ज्यामुळे संघ आधुनिक क्रिकेटसोबत आपला ताळमेळ बसवू शकेल.